गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य?
Вставка
- Опубліковано 5 чер 2024
- वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या ह्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते. गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य आणि साक्षात ज्ञानाचं भांडार कशी आहे ही माउली, जाणून घेऊया. UA-cam Mi Vatsaru.
How does this grandmother live alone in the forest for 40 years?
कमरेत वाकली परंतु कधी नाही झुकली.
वयाचं शतक करण्याच्या मार्गावर असून देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही, चष्मा नाही, सांधे दुखी नाही आणि शुगर बीपी तिला माहित सुद्धा नाही. अशिक्षित असुन देखील जगाची इतंभुत माहिती आहे.
आजीचा व्हिडिओ क्रमांक २ पब्लिक केला आहे. लिंक 👇👇
• वेळ आली होती पण काळ आल...
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
#maharashtra_village_life
#marathinews
#life_in_the_wilderness
#dhangarijivan
#graminjivan
#abpmajha
मिलिंद भोसले, मी वाटसरू
Email : milindrajebhosale@gmail.com@Mivatsaru
विडियो बनवून दाखवणे सोपे असेल पण त्या माऊलीच्या सोबत बसून गप्पा मारल्या वर तिच्या एकटं या जंगलात राहणे स्वतः दिवसभर अंगण साफसफाई करुन मानाने कष्टाने जगणे आजही सुईत दोरा घालताना तरुणांना हि लाजवेल परमेश्वराने निर्माण केले त्याला वाघाची काय भीती जिजाऊ मातेच्या पोटी शिवाजी महाराज आले हे सांगायला आजी इतिहासाची आठवण आज जाणवते अशा माऊलीला साष्टांग दंडवत
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण आहोत ..नाहीतर आज पण आपण आल्ला आल्ला करीत आसतो...काय वाक्य बोलुन गेल्या आज्जी...❤❤❤
एका घरात चार चार भावांना पाच घर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळवणारे लोक आणि जंगलातील कच्च्या घरात राहणाऱ्या आजीचे पाय धुऊन तीर्थ घेतले पाहिजे....
पण आईला आस सोडाला नाही पाहीजे एकटिला जंगलात 😢❤❤ दरवाजा पण नाही नीट
जपा अशा माणसांना. माझी आजी गेली तेव्हा तिची खरी किंमत कळली. आता आठवणीत रडण्यावाचून काहीच राहिले नाही
अशी माणसं जपली पाहिजेत
खूप छान मुलाखत आजी बरोबर... खूप सुंदर विचार आहे आजीचे... खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या पिढीला आजीच्या मुलाखतीतून आजीला दिर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना...
माझी आई पावसाळा सोडून गावालाच एकटी राहते. तीला पुण्यात किंवा इतर ठिकाणी अजिबात करमत नाही. पावसाळ्यात जरी पुण्यात आणली तरी चार महिन्यांत चार वेळा तीला गावाला न्यावेच लागते. नाही नेले तर आमच्याशी बोलत नाही. ऐवढ्या गावच्या वातावरणात समरस झालेली जुनी पिढी आहे.
आजीला साष्टांग नमस्कार,मला माझ्या आजीची आठवण आली.आज ती या जगात नाही.अश्या माणसांना जपायला पाहीजे.अशी निर्मळ मनाची माणसं या पुढं मिळणार नाहीत.
हात दमवायचं आणि पोटभर खायचं ह्या आजीच्या वाक्याने जीवनाचं अटळ सत्य समजलं. आजी ला सुदृढ आरोग्य लाभू दे हिच स्वामी चरणी 🙏
हे सत्य आहे कि जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत
धन्य ती जुनी माणसे. अगदी निर्मळ मनाची. खरं जीवन जगणारी. या माऊली ला वंदन. नसानसात जीआऊ शिवबा. महाराजांविषयी प्रेरणा देणारी माय.
ही आजी,या युगातील शबरी माता आहे.🙏
खूपच गोड आहेत आजी अगदी बरोबर बोलले जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय😊
खरंच अशी माणसं पुन्हा दिसणार नाहीत...शेवटची पिढी🙏🏻🙏🏻🙏🏻
त्या आजी एवढ्या वयस्कर आहे त्यांच्याकडून शिवाजी महाराज जिजाऊ याचा विषयी प्रेम बगून भारी वाटले
खरंच धन्य या आजी .किती छान विचार आहेत त्यांचे .उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
ते म्हणतात ना देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्या सोबतच असतो फक्त त्याला पाहण्याची ती श्रद्धा नजर असायला हवी, ह्या आजी कडे पाहून हे पटलं ❤, आशा करतो सर्वाना माझं म्हणणं उमगल असेल 👍
✨️🙏🏽✨️प्रिय आजीला साष्टांग नमस्कार आजीनं सांभाळून ठेवलेली 🏕 वास्तू
आपले मनापासून धन्यवाद आपल्या चायनल च्या माध्यमातून निसर्ग रम्य अशा सानिध्यात असणारे जीवाला जीव देणारे माणसे दाखवली आम्हला आमच्या आईची आठवण करून दिली❤️ माणसाची मनस्थिती चांगली असली की जग सुंदर दिसते पुढे बोललायला शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻