Sankarshan Karhade Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरल
Вставка
- Опубліковано 26 кві 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #sankarshankarhade #marathiPoem #abpmajhavideos #rakheepatole #marathipoem #marathi #sankarshanviaspruhajoshi #spruhajoshi #maharashtra
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणावरची एक कविता प्रचंड गाजतेय. संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी हे दोघं मिळून 'संकर्षण व्हाया स्पृहा' या कवितांचा कार्यक्रम सादर करतात. याच कार्यक्रमाच्या ठाण्यातील प्रयोगात संकर्षणनं सध्याच्या राजकारणावर मार्मिक भाष्य करणारी कविता सादर केली. विशेष म्हणजे उपस्थित रसिकांनी तब्बल अडीच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट करुन या कवितेला दाद दिली. आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. हा प्रतिसाद इथंच थांबला नाही तर महाराष्ट्रातल्या विविध राजकीय नेत्यांनी रसिक मनानं आणि खिलाडूवृत्तीनं ही कविता स्वीकारून संकर्षणचं कौतुक केलं. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, विनोद तावडे आणि आशिष शेलार या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या, हे संकर्षणकडूनच जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी राखी पाटोळेनं.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
महाराष्ट्रत कमी मतदान होण्याच कारण इकडच्या राजकारणाला लोक विटले आहेत, संकर्षण ने ते विटलेपण कविते मधुन सादर केली , त्याचे अभिनंदन
मतदार बंधू आपण मतदान नाही केले तर चुकीचे खासदार निवडले जातील.
खरय
आपल्या मतांचे अवमूल्यन होत आहे हे कळल्यावर कोणता सूज्ञ मतदार मतदानाला बाहेर पडेल?
होणारी सौदेबाजी नाही थांबली तर मतदानाचा टक्का दिवसेंदिवस अधिकच घसरणार आहे.
ग्राम पंचायत नाही 100 टक्के मतदान व्हायला
50 ते 75 टक्के मतदान लोकसभेला होत असतेच...
😊
सध्या निवडणूकींचे वातावरण असल्याने सर्वपक्षीय नेत्यांना ही कविता खिलाडू वृत्तीने घ्यावीच लागणार ! इतर वेळी वेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या असत्या ! !
आणि सर्वच पक्षांना दोषी ठरविल्यामुळे कोणीच नाराज नाही ! 😃
हे बाकी खर आहे ़
कविता ऐकून मतदान कमी झाले असे म्हणणे योग्य नाही.
😅। @@ajayvelankar6585
❤😂🎉😢😮😅😊@@ravindradevanhalli7656
संकर्षण खरोखरच एक सच्चा दिलाचा कवी आहे. तुझ्यातली काव्य प्रतिभा अशीच बहरत राहो.
वाह! क्या बात हैं.संकर्षण आगे बढो न डरो रसिक जनता आपके साथ हैं.आता मनातल्या मनात थोडं थोडं घाबरून आपणांस फोन येतील कुणाकुणाचे,पण विकले जाऊ नका,दिली कुणी लक्ष्मी ,पण लक्ष्मीचे कमळ मात्र विकू नका.खरोखर आपण सरस्वती पुत्र आहात.🙏🙏🚩🚩
महाराष्ट्राला नवा रामदास फुटाणे मिळाला. खूप छान धाडस केलस . राजकीय कविता लिहिण्याची . बिनधास्त लिही . सगळ्या महाराष्ट्राला आवडली ही कविता .
या सुंदर कवितेत संकर्षणने सगळ्याच महत्त्वाच्या राजकिय पक्षांच्या मर्मावर बोट ठेवले आहे.जर एकाच्या बाजुने बोलले दुसर्याचा विरोध केला तर मात्र झगडा होण्याचा धोका संभावतो.इथे मात्र सर्व पक्ष एकाच नावेचे प्रवासी आहेत म्हणून सगळ्यांनी खेळीमेळीने घेतली.👌♥️
गडकरी रंगायन हे ठाणे मधील सभागृह वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी ठाण्यातील जनतेला दिलेली अनमोल भेट आहे
Tyani dengi dili hoti ka?
त्याचा आणि कवितेचा काय संबंध ?
If BJP stays there will be only Gujarati and Hindi dramas eventually
संकर्षण ग्रेट! तूम्ही म्हणालात तेच खरं! जी सत्य परिस्थिती आहे सध्या , ती तुमच्या कवितेत व्यक्त होत आहे त्यामुळे सगळ्यांच्या (जनतेच्या) मनातील विचार मांडण्यात तूम्ही हिम्मत दाखवली म्हणून अभिनंदन!
"मोठे लोक खरंच किती मोठे असतात" हे वाक्य लई आवडलं 👍
हा टोमणा होता का?
नाही तरी हे निर्लजम सदासुखी!!!
संकर्षण खूप छान कविता.कलाकारही समाजात राहतो चांगले वाईट परिणाम भोगत असतो पण व्यक्त होण्याचे धाडस दाखवणारे कमी असतात बाकीचे सर्व लांगूलचालन करून स्वतः चे भले करून घेतात.म्हणूनच संकर्षण तुझे अभिनंदन लोकशाहीतील जबाबदार नागरिक म्हणून💐
अगदी खरंय
या कवितेत निखळ वास्तवता कोणावरही सहेतुक टिका न करता आलेली आहे.त्यामळे जनतेच्या भाव मनाला ती सहज भावली व तीस प्रचंड प्रतिसाद मिळाला.हीच बाब नेत्यांना ही लागु पडली.पण खरोखरच खूप उत्तम कविता आहे.खुप दिवसांनी क वि ता ऐकली .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.धन्यवाद.
अप्रतिम लयभारी ... संकर्षण सर आमच्या परभणीचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जगात जर्मनी ,भारतात परभणी 😊👏👏
संकरसन हिम्मत लागते हो याला. सलाम तुम्हाला.
संकर्षण ची कविता सध्याच्या राजकीय नेत्यांना रेशमी चिमटे घेणारी व मखमली कोपरखळ्या मारणारी आहे. या एकाच कवितेने संकर्षणला फार उंचीवर नेऊन ठेवले आहे. या आधीचे भलेभले कवी मागे पडले आहेत.
संकर्षण कऱ्हाडे आगे बढो हम तुम्हारे साथ है l 👍
परभणी कलेची नगरी... आणि संकर्षण परभणी चा कलाकार
कलाकार समाजातील समस्या कलेच्या माध्यमातून समाजा पुढे चांगल्या रीतीने मांडू शकतो. संकर्षणने चांगला प्रयत्न केला आहे. संकर्षण चे खूप खूप अभिनंदन.
संकर्षण अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्याच्या सगळ्याच कविता उच्च दर्जाच्या असतात. विठ्ठलावर केलेल्या कवितेने मन हेलावले. मुलांवरच्या कवितेने प्रत्येक बापाच्या मनातली व्यथा सांगितली. अतिशय अर्थपूर्ण, अभ्यासपूर्ण लिखाण, सादरीकरण.
संकर्षण ने जुमलेबाजी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, वाढती राजकीय गुन्हेगारी यांनी त्रस्त असलेल्या सामान्य जनतेच्या मनातलं सुद्धा खरं खरं लिहावं ही विनंती।
नाही ते BJP शी डायरेक्ट संबंधित मुद्दे आहे...त्यावर बोलायला हिम्मत लागते
एकदा पुर्या भारतात बाबरी मशीदी बांधण्यास सुरुवात झाली की सर्व प्रश्न चूटकीसरशी संपणार.
@Manoj-sv8rs एका समाजाने वर्षानुवर्षे 100% आरक्षण घेतले आता ते आरक्षणाला विरोध करत आहेत😂😂 आणि बेरोजगारी महागाई ह्या मुद्द्यांना बगल देऊन मुस्लिम विषयवार येणे ही अंधभक्तीची निशाणी आहे
@Manoj-sv8rs अर्धवट ज्ञान असेल तर त्यांनी गांधी फॅमिली मुस्लिम च वाटते
@@VijayManjrekar-xs9fe ब्राह्मण लोक च फक्त असा विचार करू शकतात
संकर्षण, तुझ्या कवितेत इतकी सहजता...साधेपणा असूनही खूप मार्मिकपणे विचारांची मांडणी आहे की कोणाचे दोष दाखवले तरी त्यांना राग येत नाही! अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो!
संकर्षण चे खरोखरच कौतुकास्पद लिखाण. अभिनंदन
ही वैचारिक व सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आहे.
नक्कीच 👍
खरोखर खूपच छान आणी संकर्षण कऱ्हाडे यांच्या गुणवत्तेला साजेशी कविता आहे. मला वाटतं ह्या कवितेच्या माध्यमातून आजच्या काळातही लेखणीमध्ये किती ताकद आहे ह्याची जाणीव सध्या बातम्या साजऱ्या करणाऱ्या वाहिन्या आणी वर्तमानपत्रे यांनी करून घ्यावी ही विनंती. 🙏
खुप सुंदर संकर्षण भाऊ ,व्यवस्थित समजलं आपल्या साहेबांना😂❤
स॑कर्षण प्रथम अभिनदन खुपच भारी आताजे राजकारण चालल्यय त्यावर अशी मार्मिक कवित मला ती युटुब वर लगेचेच ऐकाली तुझ्याप्रमाणेच माझीहि धाकधुक झालीहोती त्यानीही ती मिस्कील व हसत खेळत ऐकली तुला चागला सपोर्टदिला तुझ्या पुढील वाटचालिस मनपासुन खुपखुप शेभेच्छा
खूप खूप अभिनंदन संकर्षणजी खुपच् छान् अन् मार्मिक कविता👍🏻👍🏻👍🏻
सकर्षणा सांभाळून रे बाबा कविता करताना पायऱ्या नको चडू राजकारणाच्या लय डेंजर हाई रे राजा तु जसा जसा आहेस तसाच रहा रे बाबा
लाखात एक गोष्ट.. कुठून केव्हा खुन्नस काडतील काही भरोसा नाही
Dhamaki deto ka mad. .
खरे पणा आणि सात्त्विकता त्यांच्या विचारात आहे, मग राजकारण्यांनी काहीही म्हटले तरी आपल्या सारखे रसिक त्यांच्या पाठीशी आहेत. पु ल असेच निर्भीड होते त्यांच्या सात्विकतेचे भय राजकारण्यांनाही होते!!! महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील बोलल्या बद्दल संकर्षण आपले अभिनंदन!!!!
संकर्षण भाऊ,तुम्ही या कवीतेच्या माध्यमातून आम्हा समस्त महाराष्ट्रभिमानी मतदारांच्या एक प्रकारे ख-या व्यथाच मांडल्या आहेत.त्या बद्दल तुमच कौतुक आणि खुप खुप आभार.महाराष्ट्रातल्या या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती ला शोभेचा मनाचा मोठेपणा दाखवला त्या बद्दल सर्व नेत्यांना धन्यवाद.देशाच्या कोणत्याही राज्यात नसलेला मनाच्या मोठेपणाचा हा गुण राज साहेब आणि उद्धव साहेब महाराष्ट्र हितासाठी (एकत्र येऊन )का दाखवत नाहीत.कारण यांच्या एकत्र न येण्यामुळे निव्वळ मत वाया जात नाही तर अख्खा महाराष्ट्र परप्रांतीयांच्या घशात चाललाय.
Saheb purn deshat sarvat jast bhadkhau dalle bhadve aaple Maharashtra madhech aahet he kon aahet te nahi sangat sarv olakhatat ya rajkarnyanna sarvch dalle aahet keval tyamule deshat sarvat jast randibazar jhalai to keval Maharashtratch jhalai😂😂😂😂
संकर्षण हे परभणी चे आहेत, खूप छान कविता आहे
आपले सगळे नेते खिलाडू वृत्तीचे आहेतच. ते कधीही कोणत्याही पक्षात जाऊन बॅटींग करू शकतात!
खिलाडू वृत्तीचे नाहीत गेंड्याच्या कातडीचे आणि तितकेच नाटकी.
😂😂😂
अप्रतिम सुंदर कविता. संकर्षणच्या कविता मनाला भावणाऱ्या, हृदयाला भिडणाऱ्या कधी कधी काळजाचा ठोका चुकवणाऱ्या असतात. ❤
अश्या मारक कवितेचे जर सर्वपक्ष्याच्या नेत्यांनी कौतुक केले, तर कविता झोंबली कोणाला आणि आणि स्वाभिमानी नेता किंवा पक्ष कोणता हा प्रश्न उरतोच.
झोंबली तर सर्वांनाच असेल भाऊ... पण निवडणूक आहे बोलू नाही शकत... आणि सर्वांचीच चिन्हे आहेत -++ खिलाडू वृत्तीने च घ्यावी लागेल...
निवडणूक प्रक्रिया सुरू आहे...हे झणझणीत अंजन घालणारी कविता अगदी मर्मावर बोट ठेवणारी आहे.
नेते मंडळी एकमेकावर कशीही चिखल फेख करताना दिसतात,पण कोणीही नेता मतदारांवर चिखल फेक करायचं धाडस अशा संवेदनशील वेळी करणार नाही...
कविता मात्र अंजन घालणारी आहे.
मतदार आता खूप जागृत झाला आहे...
वास्तविक राजकारण्यांचे जबरदस्त विश्लेषण
संकर्षण कराडे परभणी चा हिरा
नक्कीच चांगली कविता आहे . तत्त्वशून्य, बेअकली आणि स्वार्थी राजकारणावर चांगलेच परखड भाष्य आहे …
Sankarshan ने अगदी खर खर लिहिले
एकदम खोल मना पर्यंत पोहोचली. 👌👌👍💖
संकर्षण याने सर पक्षांना समान जागेवर ठेवल्याने कविता भरी झाली कोणत्याच बाजूला झुकली नाही पण सगळ्यांना शिकवून गेली
वा व्वा.... संकर्षण, आपले महाराष्ट्रीयन कलाकार आणि राजकारणी पण खरंच भारी आहेत... हे हसत खेळत वातावरण कायम राहायला हवे.. जे एक कलाकारच तयार करू शकतो.
हल्ली एक अदृश्य भिती निर्माण झाली आहे जी काही राजकारणी तयार करता आहेत.. त्याला हि कविता उत्तम उत्तर आहे.
संकर्षण तू भारतीय जनतेच्या भावना अगदी सहज पणे राज्यकर्त्यान पर्यंत पोचवल्यास. आभारी आहे.
👌👌👌👍👍
*संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..*
परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत.
त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏
उत्तम कविता,थोडक्यात सर्व काही बोलून गेला.थोडक्यात सर्वांना चिमटे काढले आणि खर आयकवले.
अप्रतिम कविता👌👏👏 संकर्षण तुझे लिखाण खूप मार्मिक असते. सुंदर आणि सोप्प्या शब्दात मांडतोस , त्यामुळे शब्द थेट पोचतात.
तुमच्या कवितेचा आणि तुमचा फैनच झालो राव ... संकर्षण कर्हाडे.... खुप मस्त आणि अगदी खरं सत्तेवर... वास्तव...
5.05 to 5.18.. "हे राजकारणी खरच किती मोठी माणस आहेत आणी आपण खालती विचार करून चिखल करून घेतो" ... व्वारे पठ्ठ्या ...
म्हणजे त्यांनी सगळ्या राजकारणाचा चिखल केला म्हणून तुम्ही कविता करायची आणि त्यांनी कवितेच कौतुक केले कि लगेच तुमच्यासाठी ती मोठी माणस झाली आणि बाकी जनता विचार करून चिखल करणारी झाली.
मराठी कलाकारांना आणि साहित्यिकांना पाठीचा कणा नाही म्हणतात ते याच मुळे.. आता ते ठाकरे बंधू , पवार , फडणवीस हे सर्व कसे महान यावरही एक समर्पक कविता येऊ द्या ...
अभिनंदन संकर्षण. असाच मोठा ,मोठ्ठा , मोठ्ठा हो.
शुभाशीर्वाद.✋✋😊😊 👌👌👍👍👍
संकषॅणने आजच्या राजकारणावर मार्मिक भाष्य केलं आहे , अगदी वास्तव जे मतदारांच्या आणि राजकीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालायला पुरेसे आहे
अतिशय उत्कृष्ठ कविता! एक एक शब्द परत परत कानात मनात साठवत जाणारा खोलवर विचार करायला लावणारा आपल्यातल्या अनुभवाशी सांगड घालणारा आहे!
अशाच उत्कृष्ठ कविता पुन्हा ऐकायला मिळाव्यात 👍
खुप छान कविता... संकर्षण.... प्रॅक्टिकल गोष्टी मांडल्यास...आता फक्त इ डी ची नोटीस नाही आले म्हणजे झालं😂😂😂
खूप मार्मिक कविता.यातून राजकारणी बोध घेतील का? अभिनंदन संकर्षण.
संकर्षण .. एक नंबर कविता. लवकरच तुझं संकर्षण व्हाया स्पृहा बघायला येणार आहे. खूप दिवस झाले पेंडिंग आहे. ❤❤
संघर्ष तुमचे खुप खुप अभिनंदन 👍👍👌👌👏👏💐💐
तुम्ही आत्ताची राजकीय स्थिती काय आहे याचे उभेउभ वर्णन छान शब्दात व्यक्त केले,कुठेही इथेतिथे न बघता आपल्या भावना व्यक्त केल्या 👍👍
जे विचार तुम्ही कवितेतुन मांडलेत तेच विचार लोकांच्या मनात आहेत, मला वाटते तुम्ही न डगमगता ते बिनधास्त व्यक्त केलेत आणि जनतेच्या मनातील भावना तुम्ही मांडल्या🙏🙏
आज काही कुटुंबामध्ये हेच वातावरण आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे विचार वेगळे आहेत,ते विचार किती छान पणे मांडलेत, अगदी अजोबा, आज्जी, सुन नातु, मुलगा खरच ग्रेट आहात तुम्ही 👍👍👏👏🙏🙏❤❤
कविता अप्रतिम झाली आहे, आणि सादरीकरण अतिशय झकास ❤️
निवडणूकीच्या काळात आली आपली कविता म्हणून वाचलात . आता सर्वच नेते हात जोडून असतात .
सर्वच नेत्यांनी दाद दिली हे चांगले झाले, पण ज्यांनी हे फोडा फोडीचे गलिच्छ राजकारण केले त्यांना काही फरक पडणार आहे का? जर फरक पडणार असेल तर ते अभिनंदनास पात्र आहेत. नाहीतर निर्लज्जम सदासूखी.
Tya fasan20la bhar chaukat lokshahi mule paydali tudvalybaddal tarbujala fodala pahije😊
ज्यांनी एका पक्षासोबत निवडणूक लढवून नंतर वडिलांची विचारधारा खुंटीला टांगून दुसऱ्या पक्षांशी घरोबा केला त्यांना काही फरक पडणार आहे का? राज्याच्या राजकारणाचा चिखल हा त्यांच्या CMवाल्या खुर्चीच्या लोभामुळे झाला हे महाराष्ट्राची सुज्ञ जनता विसरलेली नाही.
आमच्या पोटातलं ते तुमच्या ओठी आलं
आजपर्यंतच्या अशा जीण्याचं सार्थक झालं.
आत्ताच्या राजकीय दलदलीवरचं
सर्वांगसुंदर, चफकल 👌कवित्व.
संकर्षणा... मनांपासून धन्यवाद रे दादा.
जी परिस्थीती घडत आहे
त्यावर ही कविता केली आहे
लेखकाच मनापासून आभार
कवी उद्धव ठाकरे साहेब विषयी
बोलले की साहेब रागवले का
माननीय उद्धव साहेबांनी जे उत्तर
दिले आहे जी खरी परस्थिती आहे ती
मांडली आहे आमच्या चुका आमच्या
पर्यन्त पोहचव्या आणी त्या तुन
आमच्यात सुधारणा व्हाव्या अशी
राजकीय नेते मंडळी कवचित दिसते
संकर्षण यांचे अभिनंदन! काल्पनीक कुटुंबातील
वास्तवाची चित्रीकरण करणारी सुंदर कविता
Very nice 👍 अप्रतिम शब्द रचना 🎉🎉
संकर्षण खुप छान. कवितेतुन समाज प्रबोधन.
जगात जर्मनी देशात परभणी🙏🙏
जय महाराष्ट्र
सर आपण जे आहे ते अगदी मिश्किलपणे मांडले आहे.
सुंदर कविता...
सत्यच मांडल छान आहे कविता
निर्लज्ज सदा सुखी, महाराष्ट्रतील जनतेला दुसऱ्या नवीन नेत्यांचा/ पक्षाचा पर्याय नाही.. नाहीतर यांना या निवडणुकीत जनतेने जागा दाखवून दिली असती..
असं खर खर लिहिणारा लेखक असो वा कवी लेखक पण त्यांची गरज आहे आणि संकर्षण म्हणजे अचूक कोणालाही न दुखावता खारेपणा मांडणारे उत्तम कवी अजून बरच काही आपण आपल्या लेखनिद्वारे जनतेची होत असलेली कुचंबणा आणि त्यांचे प्रश्न हे सगळ लिहिण्याची आपली क्षमता आहे
जबरदस्त मस्त महाराष्ट्र राजकीय सत्य परिस्थिती.
परंतु दिवसेंदिवस प्रत्येक भाषेत अश्या प्रकारे उत्कृष्ट कवी कमी होत आहे..
संकर्षण तुमचं खुप खुप अभिनंदन. अशीच प्रगती करा.
संकर्षण सर आपणास सलाम,खूप सुंदर कवितेची रचना केली आहे.नेमका भाव त्यातून लोकांपर्यंत पोहचतो आणि लोकांमधे त्यातून रस निर्माण होतो.
खूप खूप आवडली
पून्हा पून्हा ऐकून मनमूराद आनंद घेतला
पुरोगामी महाराष्ट्र आहे हे.सिद्ध झाले आहे❤thanks sir daring Keli तुम्ही.
आपले मंथन समयोचित सबब जनमन संक्रामक एकूणच जनहाती यंदाची निवडणूक सबब भलेभले नामशेष लोकशाही नियंत्रक निर्मक जनशेष साभार धन्यवाद आपले
Sankarshan is the Diamond of Parbhani.....❤❤❤❤❤❤
सर खूप मार्मिक भाष्य केले
आता खरे लिहिणारे लेखक राहिले नाहीत. तुम्ही धाडस करून कविता सादर केली. कौतुक आहे. असे स्पष्ट मत मांडणारे लेखक, कवी ,पत्रकार तयार होवो. ही सदिच्छा 🎉
सुंदर भाषा आणि उच्चार असणारा निवेदक abp माझा ला मिळाला आहे.
नमस्कार, संकरश्ण कराह्डे. लोकाच्या मनात काय चालेल आहे ते सांगितले. ह्या प्रयोगाला खुप प्रतिसाद मिळणार.राजकारणातील राजकारणाला लोक खरोखर व्यैतागलेले आहेत. धन्यवाद!!!
Yess आम्ही ह्याच प्रयोगाला होतो..तुफान धमाल आली..amhi once more ही दिला
Great beta tuze Abhinadan kavita solid saglya nethyani tuze bharbharyun kotuk kele aai bhahani aashirvad tuza sobat hahe ❤ khub mota ho maharashtra chi janata tuza sobat hahe wel done kalji ge ❤
मतदारांचा आवाज आपण सुंदर कवितेद्वारा सादर केलात. धन्यवाद.
राजकारणातल मोठेपणा हा फक्त महाराष्टातच बघायला मिळतो. सर्व नेत्याचे अभिनंदन कारण त्यानी मोठेपणाने ते स्वीकारलं त्याबद्दल.
संकर्षण तुझ खुप अभिनंदन सुंदर अशी मार्मिक शब्दांत कवीतेची रचना केली अम्हा परभणी कराना तुझा खुप अभीमान आहे 💐
Kahi varsha n purvi mann khup dukhi zale hote, barech Kalawant aaplya la sodun gele hote.😢
Pan jatana Hya Kalakara la pudhe varsa suru thevnya cha Motha Ashirwad deun gele he kalale ch nahi.
Sankarshan tuze khup Abhinandan 🎉🎉🎉.
Keep it up. Khup ch chan.
Jai Shree Ram 🙏
You mentioned all the parties in the poem. This has induced every single party to talk to you and appreciate it.
संकर्षण भाऊ , राजकारण्याच्या प्रतिक्रियेवर फार हुरळून जावू नकोस, कारण त्यांची चाल नेहमीच तिरची असते. तुझ भल चालू आहे त्यातच जास्त लक्ष घाल .हा तुला अनाहुत सल्ला आहे, एक नाट्य प्रेमी म्हणून,एका कलाकाराला.
अगदी बरोबर
सत्य,समर्पण,और साहस की सफलता ।
हाच महाराष्ट्राचा मोठेपणा आहे ❤
अप्रतिम कविता 👌👌👌
संकर्षण जी , आपली कविता लै लै लैच भारी! ... मार्मिक 👌👌🫡🫡👍👍
.... मनापासून धन्यवाद abp!🙏🙏
खुप छान मित्रा सत्य च आहे ते
संकर्षण ह्या राजकारण्यांनी तुझं कौतुक केलं म्हणून भारावून जाऊ नकोस , ही लोकं गोड बोलून घात करतील (खूप घातकी लोकं असतात ) तरी हयापुढे खूप सावधानता पाळ !!
असो तुला माझ्या परिवारा तर्फे खूप शुभेच्छा अन् आशिर्वाद !!
संकर्षण चं खरं तर खूप कौतुक करायला पाहिजे त्याने खूप धाडस दाखवले . नाहीतर आपले मराठी कलाकार कोणत्याही समस्येवर मूग गिळून बसलेले असतात .
कवीता खुपच छान लिहली आहे. संकर्षणाची कल्पना शक्ती अफाट आहे. राजकीय नेते यांना हि कविता झोंबली असेल, पण त्यांना काही फरक पडणार नाही.
कवितेत काय सुरेख राजकीय भुमिका मांडली आहे❤
कविता पण छान आणि सादरीकरणही लै भारी
सत्य स्वीकारली पाहिजे.. आणि लाज वाटली पाहिजे राजकारणी लोकांना. सामान्य माणसासाठी कोणीच नाही. मनोरंजन झाले फक्त ह्या राजकारणी लोकांचे.. एकालाही लाज वाटणार नाही आणि कोणीच त्यांच्या पक्षा शी किंवा जनतेशी प्रामाणिक राहतील असे वाटत नाही.
Mi tuza khup motha chahata aahe aani ya Kavite nantar tar..........hats off tula
संकर्षण उत्कृस्ट कविता , अभिनंदन
खूप छान अप्रतिम, परभ नी च ना व ,साहित्य आहेच कवी बी रघुनाथ यांनी केलेच आहे त्यांचा वारसा असाच पुढे चालू राहो हीच गुरू चरणी प्रार्थना
नमस्कार अतिशय सुरेख कविता केली आहे. मन:पुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉
खुप छान शंकरशन सर.. अतिशय मुद्देसुद आणि सुंदर अशी मणाला भावेल अंशी कविता...!!
जगात जर्मनी आणि भारतात परभणी
संकर्षण..गणपतीचं नाव आहे 🙏
संकर्षण विष्णू चे नाव आहे..
ही कविता सर्व राजकारण्यांनी एवढ्या स्पोर्टींगली घेण्याचं एकमेवं कारण म्हणजे ही सर्व मंडळी महाराष्ट्रीयन आहेत.मराठी आहेत.परप्रांतीय असता तर गेम पक्का झाला असता.
क्या बात है.. हे या मातीतच घडू शकत...!!!
राजसाहेब खुप चांगला माणूस आहे.
अतिशय वास्तविक कविता