का बदलतोय पालखीचा मार्ग?
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलल्याने (दि. ३ जुलै २०२४) उरुळीकांचनच्या गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पालखीच्या नगाऱ्याची गाडी रोखली. रस्त्यात ठिय्या मारला. पालखी सोहळ्याच्या कारभाऱ्यांचा निषेध केला. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याची विसावा, मुक्कामाची ठिकाणे का बदलली जात आहेत, याबाबत ।।ज्ञानबातुकाराम।।सोबत स्पष्टीकरण दिले आहे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. माणिक महाराज मोरे यांनी. सोहळ्याची परंपरा, व्यवस्थापन, अपेक्षा आदी विषयांवरही ते सविस्तर बोलले आहेत. त्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये दिली आहे.
#ज्ञानबातुकाराम
आदरणीय माणिक महाराज मोरे अतिशय चिंतनिय मुलाखत आपली प्रासादिक वाणी आणि छत्रपतींचे घराणे आणि तुकोबारायांचे घराण्यांची परंपरा एक झाल्याने भक्ती शक्ती च महत्त्व आपल्या वाणीतुन समजलं 🙏🙏🚩🚩जयहो जय तुकोबाराय
🎉काळा प्रमाणे बदलणे व झालेले चांगले बदल स्वीकारणे हे आनंदी मनाचे लक्षण आहे . प्रवाहा प्रमाणे सुधारणे व त्यांचा स्विकार करणे ही काळाची गरज आहे > डॉ.विवेकानंद डॉ.विवेकानंद मोरे
सुंदर विचार 🙏राम कृष्ण हरी 🙏
जय हरी
🙏रामकृष्ण हरी महाराज💐💐
Jay dyanoba mauli dyanraj mauli tukaram. Jay siyaram Jay hanuman.
राम कृष्ण हरी बाबा