शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला! इंद्रजित सावंत आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेनं लोकप्रियतेचा नवा कळस गाठला. मालिकेच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा प्रसंग बघताना तर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा प्रसंग बघताना भावूक झाले असतील. १५० नाटकांनी शंभुराज्यांची बदनामी केली संभाजी महाराजांवर आजपर्यंत जवळपास १५० नाटकं रचली गेलीत. संभाजी महाराजांच्या चरित्रावर जितकी नाटकं रचली गेली तितकी आजपर्यंत इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर रचली गेलेली नाहीत. यात ‘रायगडला जेव्हा जाग येते’, ‘बेबंदशाही’, ‘गडकऱ्यांचे राजसंन्यास’ अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांचा समावेश होतो. या सगळ्याच नाटकातून संभाजी महाराजांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आणि त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदनामी करण्यात आली. त्यामुळे छत्रपती संभाजी राजांची ही बदनाम झालेली प्रतिमा बदलून टाकण्यासाठी आणि सामान्यांना माहीत नसलेला खरा इतिहास समोर आणण्यासाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सुरू करण्यात आली. संस्कृतवरची मक्तेदारी मोडून काढली महाराष्ट्रात धार्मिक वर्चस्व असणाऱ्या एका विशिष्ट जातीचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर राग होता. त्याची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर झाली. त्याआधी ते स्वराज्याशी एकनिष्ठ होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या वतनदाऱ्या जप्त केल्या. धार्मिक वतनंसुद्धा जप्त केली. त्यामुळे काही लोकांच्या धार्मिक अधिकारावर गदा आली. याच वर्गानं पुढे छत्रपती संभाजी महाराज यांचाही द्वेष केला. त्यामागचं कारणंही धर्माशी निगडीत होतं. छत्रपती संभाजीराजे धर्मपंडित होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हजारो वर्षांपासून संस्कृत भाषेवर अघोषित मालकी सांगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्या विशेषाधिकारांवर अतिक्रमण झालं होतं. संस्कृत ही भाषा केवळ ब्राम्हणांची मक्तेदारी आहे, असा समज समाजात होता. त्याला संभाजी महाराजांनी छेद दिला. वासुदेव सीताराम बेंद्रे आणि कमल गोखले यांनी पुराव्यांच्या आधारे संभाजी महाराजांचा पराक्रमी, शौर्यशाली गौरवशाली इतिहास समाजासमोर आणला. वा. सी. बेंद्रे यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा खूप खोलवर अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी आयुष्यातली जवळपास १५ ते २० वर्ष खर्च केली. त्यानंतर हळूहळू संभाजी महाराजांबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. या बदललेल्या प्रतिमेचा वापर आपल्या विचारधारेसाठी आणि स्वार्थासाठी करणं, प्रतिमा चौर्य करणं ही सनातनी चाल आहे. समाजातल्या एका गटाने छत्रपती शिवराय यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी राजांचादेखील आपल्या स्वार्थासाठी वापर करण्यास सुरवात केली
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
इंद्रजित सावंत
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेनं लोकप्रियतेचा नवा कळस गाठला. मालिकेच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा प्रसंग बघताना तर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा प्रसंग बघताना भावूक झाले असतील.
१५० नाटकांनी शंभुराज्यांची बदनामी केली
संभाजी महाराजांवर आजपर्यंत जवळपास १५० नाटकं रचली गेलीत. संभाजी महाराजांच्या चरित्रावर जितकी नाटकं रचली गेली तितकी आजपर्यंत इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर रचली गेलेली नाहीत. यात ‘रायगडला जेव्हा जाग येते’, ‘बेबंदशाही’, ‘गडकऱ्यांचे राजसंन्यास’ अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांचा समावेश होतो. या सगळ्याच नाटकातून संभाजी महाराजांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आणि त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदनामी करण्यात आली. त्यामुळे छत्रपती संभाजी राजांची ही बदनाम झालेली प्रतिमा बदलून टाकण्यासाठी आणि सामान्यांना माहीत नसलेला खरा इतिहास समोर आणण्यासाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सुरू करण्यात आली.
संस्कृतवरची मक्तेदारी मोडून काढली महाराष्ट्रात धार्मिक वर्चस्व असणाऱ्या एका विशिष्ट जातीचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर राग होता. त्याची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर झाली. त्याआधी ते स्वराज्याशी एकनिष्ठ होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या वतनदाऱ्या जप्त केल्या. धार्मिक वतनंसुद्धा जप्त केली. त्यामुळे काही लोकांच्या धार्मिक अधिकारावर गदा आली. याच वर्गानं पुढे छत्रपती संभाजी महाराज यांचाही द्वेष केला. त्यामागचं कारणंही धर्माशी निगडीत होतं. छत्रपती संभाजीराजे धर्मपंडित होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हजारो वर्षांपासून संस्कृत भाषेवर अघोषित मालकी सांगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्या विशेषाधिकारांवर अतिक्रमण झालं होतं. संस्कृत ही भाषा केवळ ब्राम्हणांची मक्तेदारी आहे, असा समज समाजात होता. त्याला संभाजी महाराजांनी छेद दिला. वासुदेव सीताराम बेंद्रे आणि कमल गोखले यांनी पुराव्यांच्या आधारे संभाजी महाराजांचा पराक्रमी, शौर्यशाली गौरवशाली इतिहास समाजासमोर आणला. वा. सी. बेंद्रे यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा खूप खोलवर अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी आयुष्यातली जवळपास १५ ते २० वर्ष खर्च केली. त्यानंतर हळूहळू संभाजी महाराजांबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. या बदललेल्या प्रतिमेचा वापर आपल्या विचारधारेसाठी आणि स्वार्थासाठी करणं, प्रतिमा चौर्य करणं ही सनातनी चाल आहे. समाजातल्या एका गटाने छत्रपती शिवराय यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी राजांचादेखील आपल्या स्वार्थासाठी वापर करण्यास सुरवात केली
4.tasancha.purna.natak.ka.dakhvat.nahi.purna.dakhva.plz
Sambhaji Maharaj
Jay shambhuraje
जय शंभूराजे
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️♥️♥️♥️♥️♥️
👌👌👌👌👌👌👌
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
Jay shambhuraje....🚩🚩
जय शंभुराजे 🚩🚩
जय शंभुराजे 🙏🚩📿🔥🔥🔥🔥🔥🔥
Please do one more show in pune. We loved to watch it live in pune
Jay shivery Jay shambhu raje
Ya natkatil powada sampurn milel ka sir plz
👌👌👌👌👌
Song name ....🙏
Mrutyunjay
jay shambhuraje
jay shamburaje