विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे नेते, भाग ४
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- www.bharat4india.com
'भारत४इंडिया'नं मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यानं देवळी (जि. वर्धा) इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शेती अर्थकारणाचे गाढे अभ्यासक विजय जावंधिया यांनी 'पशुधन आणि शेती' यांचं महत्त्व विषद केलं. जनावरं टिकली तरच शेती पिकेल आणि अशा विषमुक्त शेतीतून पिकलेल्या शेतमालामुळं समाजाचं आरोग्य टिकेल, ही गोष्ट त्यांनी सोदाहरण स्पष्ट करुन सांगितली.