आता केवळ आरक्षणाने समाजाची उन्नती होणार नाही - प्रविणदादा गायकवाड I Sambhaji Brigade I अभिव्यक्ती
Вставка
- Опубліковано 27 жов 2024
- आता केवळ आरक्षणाने समाजाची उन्नती होणार नाही..
आपल्या विविध कृतींनी मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक अवकाशात चर्चेत राहिलेल्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यासोबत एक सर्वस्पर्शी आणि रोखठोक संवाद..नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा..धन्यवाद..
#sambhajibrigade #aarakshan #abhivyakti
Mail;ravindrapokharkar1@gmail.com
खुप छान सर, तुम्हाला आर्थिक, सामाजिक , भौगोलिक, ऐतिहासिक,संविधानीक सर्वच माहिती आहे तुम्हाला ....अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मुलाखत संभाजी ब्रिगेड आणि अभिव्यक्ती चॅनल च मनापासून धन्यवाद ❤❤❤😊
खूप छान अभ्यासपूर्ण मांडणी असलेली मुलाखत
उघडा डोळे,पहा निट,,
आपल्या डोक्यावर आपलाच मेंदू असावा फीट..
योग्य मार्गदर्शन आभारी सर.....
खूप मौलिक विचार प्रविणदादा “संघर्षातून समृध्दीकडे” असा विचार मांडणारे प्रवीण गायकवाड आम्ही पाहत आलो आहोत. मराठा समाज आणि बहुजनांना प्रेरित करण्यासाठी योग्य व्यक्तीला आपण योग्य संधी देत चॅनेलवर आणलेत. त्याबद्दल पोखरकरसाहेब आपले आभार आणि मौलिक विचार पेरणीकरिता खूप खूप आभार प्रविणदादा 👍🙏
संभाजी ब्रिगेड ने,बौद्ध,चर्मकार,आदिवासी,ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजाला एकत्र घेवून आपली संघटना चळवळ चालवली तर सर्व समाजाची साथ मिळेल,सर्व समाजाचं भल झाल तर,शिवराज्य महाराष्ट्रात नांदेल,जय भवानी जय शिवाजी,जय महाराष्ट्र,जय भारत❤🎉
खूप चांगली माहिती सांगितली आशिष प्रबोधन करीत समाज सुधारणा करा निश्चित यश येईल
बड़ौदा नरेश सयाजी राजे गायकवाड़ यांचे वंशज प्रविणदादा गायकवाड़, हे अत्यंत सामान्य माणसा सारखे समाजात वावरतात,
राजे असल्याचा थोडा ही अभिमान नाही, या दादांच्या साधेपणाला मानाचा मुजरा 🙏
अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप छान साहेब.
छान चर्चा, मार्गदर्शनपर मुलाखत
काही क्षणासाठी सुन्न झालो या मुलाखती नंतर. नक्कीच मी आज संघटना परत जॅाईन करतोय.
धन्यवाद दादा!
खुप प्रेरणा देणारे विचार अगदी योग्य प्रकारे आपल्या सर्वांच्या समोर ठेवले व एक वैचारीक क्रांती घडवून आणली आहे जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏
हेच विचार जर हिंदुत्ववादी संघटने ने जर सांगितले. तर इथल्या बहुजन समाजाच्या मुलांची प्रगती झाल्या शिवाय राहणार नाहीं. धन्यवाद सर. 🙏💐. धन्यवाद अभिव्यक्ती चॅनल
🙏🙏🙏
Maratha bahujan nahi😂
@@शिवबाआमचामल्हारीbramhan hindu nahit
😅😅😅😅 br
@@शिवबाआमचामल्हारीmg kay khastriya ahe kay
Prvin dada Gaikwad sataash prranam. Aaplya suvidh vicharala. Anek subhechhy. Jay shivrai Jay bhim.
दादा आज आपल्या ब्रिगेडची फारच उणीव जानवते.आपण बाहेर स्वर्ग डुंडण्याआधी ,स्वर्गासारख्या देशाची मुठभर सनातन्यांकडुन राख रांगोळी होताना पहावत नाही.देश खुप संपन्न आहे आपला,एवढा भ्रष्टाचार होऊनही एवढ्या लोकांचे पोषण होतेच ना!दादा,खुप छान मार्गदर्शन केले,आपले मनापासुन आभार!
सर आपण व संभाजी ब्रिगेड योग्य पद्धतीने बहुजन समाजाचे मार्गदर्शन करत आहात... 👍👍👍
अतिशय उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद मा . प्रविणदादा गायकवाड आणि अभिव्यक्ती ..🙏
धन्यवाद 🙏
माननीय दादा तुम्हाला सक्रिय व्हावे लागेल आपण सक्रिय नसल्यामुळे हा सर्व महाराष्ट्रात गोंधळ निर्माण झालेला आहे...
जेव्हा नेतृत्व दिशाही नसतं समाज ही गोंधळलेला आणि दिशाही आ सतो..
ध्येय. जेव्हा डोळ्यासमोर असते तेव्हा. नेतृत्व योग्य कामकरते......
खुप मौलिक विचार, भरकटलेल्या तरूणांना योग्य दिशा देणारी मुलाखत 👌❤️
धन्यवाद 🙏
@@abhivyakti1965 Dennis Kincaid Chae Pustak Pun Vacha Shivaji The Grand Rebel 📢 Sambajee Brigade Maratha Sewa Sangh Panchfula Prakashan Va Sarvana Nerop Dya 🤠💦🌹
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण मुलाखत... प्रविण गायकवाड साहेबांनी मांडलेल्या विचारांची गरज मराठा समाजाला आहे.. सध्याच्या तरूण पिढीने राजकीय आणि धर्मांध नेत्यांच्या मागे न जाता स्वतःचे आणि समाजाचे हित कशात आहे याचा विचार करण्याची गरज आहे... पोखरकर साहेब धन्यवाद..
आभारी आहे 🙏
खूप अभ्यासपूर्ण, डोळे उघडणारी मुलाखत . दोघांचे खूप आभार.
धन्यवाद 🙏
प्रविण गायकवाड सर आपला अभ्यास खुप मोठा आहे.मराठा समाजाने जागतिकीकरण मध्ये टिकावा रहावा. याची सुरुवात म्हणून आपण जी चळवळ वैचारिक प्रबोधन करुन मराठा समाजाची मानसिकता उभारणी करत आहे.त्याची अत्यंत गरज आहे. आपले विचार ह्रदय परीवर्तन करणारे आहे.
मा म देशमुख, डॉ आ ह साळूंके, श्रीमंत कोकाटे, न्यायमूर्ती कोळसे पाटील आणि प्रवीण दादा गायकवाड ही मानसं सातत्याने आपल्या पुस्तकातून विचारातून आजच्या बहूजन पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या विचारवंतांना आम्ही किती गांभीर्याने घेतो हा खरा प्रश्न आहे. 'राजकारण आणि क्रिकेट सारख्या वायफळ विषयावर आम्ही आमची आयूष्य खर्ची घालत आहोत' असे जे प्रवीण दादा गायकवाड म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे. सार्थक चर्चा धन्यवाद.
खुप छान बोललात
आभारी आहे 🙏
👌👌👌
हे लोकं आपल्या समाजाला लागली ली वाळवी आहे, दूर राहायचं, एक नेता जारंगे पाटील
एकच नेता मनोज पाटील जरांगे.
जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम, जय संविधान.आजचे आधुनिक समाज सुधारक, मार्गदर्शक ह्यामध्ये अग्रणी नाव म्हणजे प्रवीणदादा आणि संभाजी ब्रिगेड. त्यांच्या अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा स्तुत्य उपक्रम. छान मुलाखत सर तुमचे खुप आभार.
धन्यवाद 🙏
खुपच छान सर खुपच छान सर. जगात कुठेही एका व्यक्तीकडे कुठल्याही व्यवसायातून पैसा जास्त झाला की त्याची अप्रत्येक्ष पणे अर्थिक हुकुमशाही येते आणि ते आपल्या व्यवसायातून व्यापारातून देशातील लोकांचे दरडोई अर्थकारणाचा र्हास होतो लोकांचे अर्थकारण संपवले जाते. जरी त्या त्यांच्या व्यवसायातून व्यापारातून नोकार्या मिळत असतील रोजगार उपलब्ध होत असेल तरीही लोकांचे दरडोई अर्थकारण र्हास होते ते संपवले जाते काही दुकांदार्या संपूर्ण भारतात एकच व्यक्ती एकाच नावाने देशात चालवत आहे यातून दरडोई अर्थकारण एका ठिकाणी सकलीत होत आहे. आणि इतर मध्ये पुर्वी तालुक्याच्या ठिकाणी तिन ते चार तेलाचे घाने असायचे आता मोठे मोठे तेलाचे कारखाने आले आहेत हजारो क्विंटल माल तो कारखाना चालू करण्यासाठी लागतो आणि त्यामुळे शेतकरी व छोट्या छोट्या तेल मिलावाल्याचे नुकसान झाले आहे शेतकरी आपल्या मालातून तेल काढून आणायचे आता ते बंद झाले आहे याला जबाबदार सरकार व एकाधिकारशाही आहे.
अभ्यासपूर्ण मांडणी केली सर आपण
कर्मकांड सोडा प्रगती होईल, स्वानुभवातून.....
दादा तुम्ही आधुनिक युगाचे प्रबोधनकार आहात, तुम्ही जे बोलत आहात आमच्याच भावना तुम्ही मांडताय असे मला वाटतंय, बदलत्या जगानुसार बदल स्वीकारावेत हा निसर्गनियम आहे,बदल स्वीकारणारा जिवंत राहतो जो अपडेट होत नाही तो नामशेष होतो आणि हे नैसर्गिक आहे, आपण हे खूपच मोलाचे ,ऐतिहासिक व क्रांतिकारी काम करत आहात,Salute❤
🙏🙏🙏
खुप चांगली मुलाखत, बहुजनवादी व समतावादी विचारांना व लोकांना चैतन्य देणारी मुलाखत
धन्यवाद 🙏
Excellent 👍 खुपचं प्रेरणादायी विचार ❤
आपण अतिशय उत्कृष्ट अस समाज प्रबोधनाचे काम करताहेत. हा संदेश सर्व तरुण मराठी पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे. एकदा त्यांची मानसिकता बदलली की पुढच्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्राचे चित्र सामाजिक, आर्थिक दृष्टीने नक्कीच बदललेल दिसेल. आपण करत असलेल्या कार्याला शुभेच्छा !
धन्यवाद!
आभारी आहे.. 🙏
प्रवीण दादा तुम्ही खूप छान प्रबोधन करता 🎉🎉🎉🎉🎉🫡🫡🫡🫡🫡
I, salute you,💯 correct information, explenetion, good one, MR, PRAVIN DADA, JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💐💚
Thanks a lot
अतिशय योग्य मार्गदर्शन करत आहात गायकवाड साहेब, अर्थकारण महत्त्वाचे, उगीच केसेस मागे लावून घेण्यात अर्थ नाही.धर्म आपल्याला झेपेल तेव्हढे करावे.
शौर्य म्हणूनच शिवाजी महाराजांना मानतात. अहिंसा आता कालबाह्य झाली आहे.आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे, जगात कुठेही अहिंसा आता शिल्लक नाही, इस्राईल कडे बघा. काळा प्रमाणे दिशा देणारे नेते हल्ली कमी झालेत.
अनमोल विचार.
वैचारिक आणि कृतिशील यांचे व्यासपीठ म्हणून अर्थातून समर्थ होण्याची समज देणाऱ्या संघटनेत सामिल व्हायला आवडेल.
❤
Pravin Gaikwad Yana maza Namaskar Jay Bhim
tumchyasarkhe vicharvantanchi garaj ahe
आजच्या तरुण वर्गाला डोळे उघडून बघण्यासारखी उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन अशा प्रकारची मुलाखत.
धन्यवाद भाऊ 🙏
अगदी मनाला भावणारे विचार आपण सांगितले दादा
अभ्यासपूर्ण विचारांची उत्कृष्ट मांडणी वं मुलाखत.
सर प्रथम आपल्याला धन्यवाद! आपण अतिसुन्दर काम करत आहात. आज नाही पण उद्या समाज डोळे उघडेल. आपल कार्य सतत चालू ठेवा. माननीय प्रविण दादा हे नुसते बोलत नाहीत तर ते कृतित आणतात. आज राजकाणी आपल्या हातात एक खेळण देतात आणि आपल्याला गुंतवून ठेवतात हे समाजाला समजायला हव .
खरं आहे 👍
Pravin Dada, khupach chhan vichar mandalet aapan...aapnas sastang dandvat...
दोघेही प्रचंड मोठे आहात असेच सर्व काही पेरीत रहा
जय जिजाऊ, महत्वपूर्ण,100%सत्य,fakt आहे, नवी दिशा👌👌👍👍💐💐
धन्यवाद 🙏
अभिव्यक्ती चॅनल ला मांनाचा मुजरा |
आपण केलेल्या वैचारिक मंथननाची दखल येणारा काळात इतिहास नोंद घेईल यात शंका नाही !
आपणा दोघांना सप्रेम जयभिम आपणां स दिर्घ आयुष्य लाभो हिच तथागता चरणी वंदन !
जय शिवराय जयभिम !
धन्यवाद 🙏
eye opener interview and insights into the future of maratha community
प्रविण दादा गायकवाड आपण उत्तम अभ्यासू वक्ते , सामाजिक राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आणि सक्षम असे आहात. आमची आपणास विनंती आहे . आपण जर वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी घेऊन लढलात तर निश्चितच आपणास जनता सत्तेत सहभागी होण्यासाठी निवडून देईल . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र. जय VBA .
पूर्ण मुलांखत दाखवा 🙏🏻💪
प्रचंड अभ्यासपूर्ण मुलाखत,समाजव्यवस्थेला विचारांचे फटके देणारं व्यक्तिमत्त्व,आपल्या विचारांना मानाचा मुजरा...
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवण्यासाठी सरकारने कायदा करावा.लोकांनी जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करावेत.जातीच नामशेष होतील.आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.
मुळात समाजात तिरस्कार,किळस,अस्पृश्यता ही फक्त वर्ण व जातीवर आधारित आहे म्हणून जात काढणं अवघड..
प्रविण दादांचे विचार ऐकणे हि एक पर्वणीच असते खर आहे हे संघटनेचे मार्गदर्शन करत होते तेव्हा संघटनेला खरच एक वेगळेच वजन म्हणा वलय म्हणा होते समाजाने त्यांचे अभ्यासू विचार फाॅलो करावेत त्यांच्या आभ्यासूवृती बद्दल अभिमान वाटतो
त्यांचे विचार ऐकवल्या बद्दल चासकर सरांना धन्यवाद 🙏🌹🙏
धन्यवाद 🙏
खूप छान दादा आता अश्या च मार्गदर्शनाची गरज आहे समाज्याला.धनवाद🙏
🙏🙏🙏
प्रवीण दादा आपले विचार ग्रेट आहेत, पण मराठा समाजाला समजाऊनार कोण, कारण ते समजण्या पलीकडे आहेत त्यांच्या डोक्यात विषमता वादी हावा आहे आणि त्या परीने ते जगत आहेत, ते आपले विचार समजून घेण्या पलीकडे आहेत
आपण प्रयत्न करत राहुयात.. 👍
गायकवाड करतील का सोईर संबंध बौद्ध किंवा SC/ST बरोबर ?, बोलाचा भात बोलाची कढी, जो बामण गेलाय परदेशीं त्याला झोडून स्वतः ची पोळी तुपा सह वढी 😀😀😀😀
Maratha samajala jativad sodayla ajun 30 yrs tari lagtil ase mala vatte.
@@ayuaamahor2247करतील !
@@ayuaamahor2247 ब्राम्हण समाजाला शिव्या घालून काय मिळते,नोकरी मिळते की उत्पन्न वाढते,की तुम्ही सुखी होता..हे जर तुंम्हाला मिळत असेल तर खुशाल शिव्या घाला..
खुप छान मुलाखत, संभाजी ब्रिगेड विषयी आदर निर्माण होतो.
जय शिवराय,सर छत्रपती शिवाजी महाराजांचे नकली स्मारकं उभरण्या पेक्षा गडकोट किल्ले ही जीवंत स्मारकांवर खर्च करा, त्यांचं संवर्धन करा, कशाला रिकामा खर्च करून पैसे खाण्याचे कुरण तयार करता.कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय.🚩🙏🙏
अगदी बरोबर...
जय जिजाऊ जय शिवराय
Excellent interview sir..... Jay jijau jay shivray jay jyoti jay bhim....!!!!
🙏🙏🙏
khupach chan ... eye opener ☺️
good interaction ... host also need applause 👍👍... keep uploading such dynamic videos
Thanku चांगलं मार्गदर्शन केलंत
प्रवीण दादा गायकवाड यांनी खूप छान मार्गदर्शन केले त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
Good address about , artha karan '. Ok thanks
Excellent discourse from Pravindada Gaikwad. Really great sir . The true history .
Very positive motivational thoughts.
मग काय गुलाम गीरीत राहायचे प्रविन दादामराठा आहे क्षत्रीय आहे तुम्ही म्हणता जस येईल तस बदलायच जर ही लोक शिवाजी महाराज फुले आबेडकर याच्यावर टीका केली तरी ऐकायची का
आज प्रत्येक मराठी तरुणाने बघावा हा Video व Video तून बोध घ्यावा अशी ही सुंदर चर्चा ह्या Video मधून दाखविली आहे ! गायकवाड सर यांनी सदर video तून अतिशय सुंदररित्या प्रबोधन व मार्गदर्शन केले आहे ! पोखरकर सर आपले जाहीर आभार ! आपण ही चर्चा आपत्या चॅनेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली ! नक्कीच मराठी तरुण यांतून बोध घेतील अशी आशा करतो ! धन्यवाद ! 🙏🙏🙏
आभारी आहे 🙏
Very nice discussion by Shri Praveen dada gaikwad jaibheem jaishivray, sir
मा. प्रविण दादा गायकवाड साहेब, आजच्या पिढीला ( तरुणाईला) खूपच योग्य मार्गदर्शन केले,आपले खुप खुप आभार......!
प्रवीण दादा...... तुमच्या विचाराची आजही गरज आहे..... तुम्ही या वेळेस मा. उद्धव ठाकरे साहेब, मा. प्रकाश आंबेडकर..... याना साथ द्या...... कारण हि आपली शेवटची लढाई आहे........ जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी......... 🚩🚩🚩🚩🚩🚩
अनाडी मराठ्यांनी बोध घ्यावा. उत्कृष्ट विचार.
अगदी बरोबर आहे दादा विचार व प्रेरणाच महत्वाची आहे.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त मराठी नाही जरी सुधारले बिघडणार तर नाही ना याची काळजी घ्यायची आहे यासाठी आरक्षण लागतय
motivational information. Pravindada Gaikwad.dhanywad.
धन्यवाद दादा आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केलात नवीन पिढीला
समाजाला दिर्घकाळ पर्यंत आपल्या आधुनिक विचारांची आवश्यकता आहे.
अर्थकारणावर आपले विचार मौलिक आहेत.
धन्यवाद 🙏
प्रवीण दादा आपल्या घरात जो मोठा माणूस असतो त्याला आपण दादा म्हणतो मग ते वडील असतील मोठा भाऊ असेल कींवा वडीलधारी माणसे असतील तर त्यांना आपण दादा म्हणतो जो सर्वांचे हितच चिंतित असतात................ संपूर्ण समाजाचे हित चिंतणारे खर्या अर्थाने आपल्या समाजाचे दादा................. प्रवीण दादा
👍❤️
कसाय आपल्यात मराठी लोकांनी मराठी लोकांच्या हिताचे काही सांगितले तर मराठीत तरुणांना ते विचार पटत नाहीत पण बामनाने खोटा इतिहास खोटी माहिती दिली तर त्यांना पटते हे आपल्या मराठ्यांचे दुर्दैव आहे
हाच सर्वत्र अनुभव आहे.
महाराष्ट्रातील जनतेला दूरदृष्टी, मार्गदर्शक , मनाला उभारी देणारी दादांची मुलाखत
Great work
प्रवीण सर खुप छान विचार बुध्दी अपना कडे पाहत salute
प्रवीण दादा गायकवाड यांनी खूप छान विश्लेषण केले आहे.अभ्यास करा, वृथा अभिमान बाळगू नका. कल्याणाचा मार्ग
अनुसरला पाहिजे.
प्रवीण दादा एकदम प्रबुद्ध आहेत🎉 खरा रयतेचा मराठा आहे
होय..
मी आत्तापर्यंत ऐकलेल्या खुपशा मुलाखतीं मध्ये सर्वोत्तम व माहिती पुर्ण मुलाखत
धन्यवाद 🙏
Motivational speech
शांततेच्या मार्गाने 51 मोर्चे काढले पण आरक्षण मिळाले नाही.आज पुन्हा गुलाम गिरि कडे वाटचाल सुरू झाली आहे.आता पुन्हा सनातन धर्म प्रस्थापित करायचाय आहे . अनेक महाराज आपल्या प्रवचनात उल्लेख करत आहेत वेळी च सावध राहा
आदरणीय प्रवीणदादा गायकवाड 🙏🏻👌🏻
जय मुलनिवासी 🌹 बधाई 🌹 मंगलमय शुभेच्छा 🌹
छान छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹
इतिहास सत्यशोधक समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत गायकवाड साहेब जय जिजाऊ जय शिवराय 🌹 बधाई 🙏🙏🙏🌹🙏
महापुरुषांच मार्केटिंग ही कोणत्याही समाज घटकांची मक्तेदारी असु शकत नाही.
जे समाज आपला वेळ, साधन सामग्री, संघटना, शक्ती केवळ आणि केवळच सामाजिक न्याय व उन्नतीसाठी वापरतात तेच प्रगती करत आहेत.
आरक्षणाने उन्नती होऊ अगर नाही पण मराठा समाजाला obc मधून आरक्षण भेटलं पाहिजे.
मी एक विद्यार्थी आहे आणि माझे शिक्षण घेताना काय हाल होत आहेत हे मला माहिती आहे. आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे साहेब जरी आपण विचार बदलले तर पैसे, सवलती भेटत नाहीत..
खूप चांगले मार्गदर्शन केले आपण धन्यवाद
खूपच सुंदर
मुलाखत ही टप्या टप्याने एक एक सामजिक विषयावर घ्यावी आणि प्रसारित करावी ही विनंती.
Gaikwad saheb aapan aaj aaplya atyant uchh vicharani dhanya kelat, aaplya sarakha PM ya deshala labhava hich prarthana
Very very nice information. Thank so much sir 6
बहुजन समाजाला शहाणे करुन अचूक माहिती पोहचविण्याचे कार्य साळुंखे सर, कोळसे पाटील साहेब, गायकवाड साहेब, श्रीमंत कोकाटे यांनी केले नाहीतर खरी माहिती आजपर्यंत उजेडात आली नसती. यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत.
होय.. 👍
All r like CASTISM 😮
प्रश्न विचारांचा नाही तर प्रश्न स्वभावाचा आहे.. ते छत्रपती होते म्हणून लढले आणि स्वराज्य निर्माण झालं जर ते व्यापारी असते तर त्यांनी राज्य गहाण ठेवून व्यापार केला असता.. तसाच स्वभाव जाती जाती मधे असतो.. मारवाडी गुजराथी व सिंधी लोक भांडण करण्या पासून लांब रहाता पण कर्ज काढून व्यवसाय करायला घाबरत नाही. आणि मराठा व इतर समाज स्वाभिमान टिकवण्यासाठी मरायला घाबरत नाही पण व्यापार करण्या साठी कर्ज घेयला घाबरतात हिच खरी वस्तुस्थती आहे.. आणि हे कोणीच बदलू शकत नाही.
खूप छान
प्रविण दादा आपण योग्य बोलत आहात.हा विचार मराठा,obc,bc,st,nt या सर्व वर्गात हे जोरात प्रसारित केले पाहिजेत.तरच आपला बहुजन समाजात परिवर्तन होईल. जय शिवराय, जय शाहू, जय फुले, जय भीम, जय भारत.
One of the great interview.....think about it our brothers maratha community
अतिशय सुंदर विचार आजच्या तरूणांना प्रेरणा देणारे आहेत धन्यवाद सर
धन्यवाद
आपणच आपल्या जिवनाचे शिल्पकार ह्याला अनुसरून केलेले मार्गदर्शन.
बहुजन समाजाला डोळ्यात अंजन घालणारे आणि प्रेरणा देणारे विचार मांडले आहेत. धन्यवाद, आपल्यासारखे असे अनेक अर्थ साक्षरतेचे महत्व सांगणारे आणि जागृती करणारे लोक निर्माण व्होवोत.
धन्यवाद
योग्य मार्गदर्शन
Chatrapati Shivaji Maharaj यांची प्रेरणा हीच आहे की आपल्या हकक अधिकारासाठी आपल्याच भूमीत क्रांती करून स्वराज्य स्थापन करून व्यवस्था बदल करावा. व्यवस्था बदलली की आपोआप समान संधी अधीकार उपलब्ध होऊन सर्वांची सारखी development होतेच. हेच बळीच राज्य होत हेचं भगवान बुध्द चे विशवगुरू आणि महासत्ता भारत होण्याचं तंत्र होत.
Dhanyavad sar very Very Nice sar
प्रविण दादा सारखे थोर संशोधक विचारवंताची आज या महाराष्ट्राला खरी गरज आहे द ग्रेट मॅन
अतिशय मोलाचं व वास्तववादी मार्ग दर्शन/विचार.