New Education Policy: नवीन शैक्षणिक धोरणामुळे काय काय बदलणार? आव्हाने काय असू शकतात? Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 9 кві 2023
- #BolBhidu #NewEducationPolicy #Education
१९८६ मध्ये म्हणजे ३६ - ३७ वर्षांपूर्वी पहिलं शैक्षणिक धोरण देशात लागू झालं होतं, त्यानंतर १९९२ मध्ये या शैक्षणिक धोरणात बदल केला गेला होता. त्यानंतर आता नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. २०२० मध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन शालेय धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. आता १० +२ असं जे बेसिक स्वरूप होतं त्याऐवजी 5+3+3+4 ही नवीन स्वरुपाची प्रणाली अप्प्लाय केली जाणारे. आज सविस्तर माहिती घेऊ नवीन शैक्षणिक धोरणाची आणि यामुळे काय काय बदलणार आणि आव्हाने काय असू शकतात ते ही बघू
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
शाळांचा बाझार झालाय तो बंद झाला पाहिजे सरकार ने विचार करायला हवा
याच वर खरो खर सरकारने विचार करायला पाहिजे
@@dineshavachat right
@@dineshavachat खाजगी शाळांच्या उन्नतीकरता घेतलेला निर्णय, शाळेतील 8वी,9वी,10वी,अकरावी,यांचे एकत्र गुण दिले जाणार. या शाळेत पैसे घेऊन मार्कस् दिले जाणार,
Right
सगळे शिक्षण मराठी मध्ये शिकता येईल ही गोष्ट स्वागतार्ह आहे मधल्या काळात इंग्रजी च इतके फँड वाढले की Z P च्या शाळा बंद पडायची वेळ आली आणि मराठी भाषेची खूप हेळसांड झाली
पुस्तकी ज्ञाना बरोबर व्यवहार आणि सामाजिक समज पण शिक्षणात अपेक्षित आहे
english medium school is must
Yes to get a good job in any another state English is must
मी एक सायकल आणि गाडी दुरुस्ती करतो
तेव्हा काही मुलं सायकल दुरुस्ती साठी आणली तेव्हा मी 85₹ झाले असं म्हटल्यास 4ते5 जना पैकी फक्त एकाला समजलं अन् त्याने सर्वांना इंग्रजी मधे सांगितले कीती पैसे झाले ते....
*हे कंडिशन आहे मराठीची*
@@shubhammarotkar7263 🙏
10 वी झाल्या नंतर मला इंग्रजी येत नव्हतं म्हणून मी आर्टस् ला गेलो 😂 माझा all time intrest हा science मधेच होता. 😊 (जिल्हा परिषद विद्यार्थी ची आत्म कथा )
12 वी पर्यंत शिक्षण मोफत व्हायला पाहिजे. सर्व समाजासाठी. सगळीकडे समान अधिकार पाहिजे. Talent ला महत्व दिले गेले पाहिजे
खरं आहे
Moffat shikshan fakt EBC yaana asel .
Gr8
संपूर्ण शिक्षण मोफत व सक्तीचे केले पाहिजे.
100% agree
आपण सर्व महाराष्ट्र मध्ये राहतात पण बोर्ड चा syllabus वेगळा आणि ncert चा वेगळा 12 विचा मुलांना बोर्ड चा अभ्यासक्रम कऱ्याचा म्हणलं तर महाराष्ट्र बोर्ड ची पुस्तके हाताळावी लागतात. आणि JEE आणि NEET सारख्या प्रवेश परीक्षा साठी ncert चा अभ्यास करावा लागतो. म्हणून आपला सर्व अभ्यासक्रम ncert चा असावा. तुमचा मत काय आहे मित्रानो 👍💭
Well come.
Jyala Jee Ani Neet chi pariksha dyaychi nahi aahe mg tyane pan Ncert cha aabhyas karava ka 😅
Right Sir
@@cartoonviral19 हो म्हणजे बोर्डला पण ncert चा अभ्यासक्र्म् आसावा. one nation one education. म्हणजे त्यांना बोर्डचा अनि ncert वेगला अभ्यास्क्रम आसला तर त्यांना वेगळ्यां परीक्सेसाथी वेगळा अभयास कराव लागतो. त्यामुळे सारखा अभ्यास क्रम असल तर त्यांना फ़क्त एकच पुस्ताक वापरतें .
@@mohanchate5894 hm 😊 sahi kaha bro 😌
फायदे व तोटे दोन्ही सांगावे.
फक्त एक बाजू सांगू नये.
Research वाढवा.
@TECH BASIC DAILY
Correct
But everything has advantages and disadvantages.
put this in front of viewer.
Godi media😂
कृषी विषयक अभ्यासक्रमाचा पण समावेश केला तर हे धोरण खऱ्या आर्थी नियोजनपूर्वक आणि सर्वात महत्वाचे आणि यशस्वी ठरेल ...🙏🏻
नवीन शैक्षणिक धोरणाच स्वागत करावयास हवे.कारण,आवडीचे विषय निवडल्यामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल आणि त्यातून समाजोपयोगी आऊटपुट मिळेल. खरोखरच शिक्षणातून आऊटपुट देणार हे शैक्षणिक धोरण म्हणून याकडे पहावयास हवे.
इंजनीअरिंग चे शिक्षण मराठी माध्यमातून घेता आलेच, तर १२वी पर्यंत मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. फक्त इंजिअरिंगच शिक्षण मराठीत घेतल्यानंतर नोकरी शोधत असताना उगाच इंग्रजीला प्राधान्य नसावे, इंटरव्ह्यू मराठीतन सुद्धा घेता येऊ शकता, याकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे.
🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰
मला change हवा आहे
Yes .actually mi 2019 BCS pass ahe interview English education low quality khup avgad zal ahe job Lagat nahi ahe 😮
@@amarmarne542 You can improve your English by simple steps like analyse 3000 daily vocabulary words with 50 Grammer rules with daily English newspaper loud reading. Find unknown words from newspaper use it in sentence. Speak more English with help of some apps
अगदी बरोबर आहे mechanical engineering sathi pan kahi शब्दा he इंग्रजीत असावे नाहीतर मराठी सोडून संस्कृत शब्द पण येतील त्याचा वाचनाचा त्रास विद्यार्थ्यांना होईल
यावर काही निर्बंध पण असावेत
सर, आपण खूप सुंदर माहिती दिली, आणखीन खूप अभ्यासक्रमासाठी मातृभाषेत शिक्षण मिळणे आवश्यक आहे. .उदाहरणार्थ सी.ए.
बरेच विद्यार्थी बुद्धिमान असतात परंतु त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान परिपूर्ण नसल्याने ते मागे पडतात त्यासाठी सर्व अभ्यासक्रमाचे मातृभाषेत होणे गरजेचे आहे असे वाटते
In this new education policy English should be there so that the students may interact with the rest of the world in each and everyfields .
सरजी आपण जी माहिती दिली ती फारच छान आहे मराठी मध्ये इंजिनियरिंग व वैद्यकीय शिक्षण मिळालं तर महाराष्ट्रातून कितीतरी सायंटिस्ट निघतील व ग्रामीण विद्यार्थी हा शहरी विदयार्थ्यांच्या कितीतरी पुढे गेलेला दिसेल. मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीच लक्षण आहे. हे काम फक्त मोदी सरच करू शकतात. त्यांनी आदिवासी व ग्रामीण लोकांना जवळून पाहिलं आहे. ग्रामीण भागातील तरुण व जनता मोदी सरांना देव मानतील.जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर लागू व्हायला पाहिजे.आपोआप ठेकेदाऱ्या बंद होतील. स्वयंसेवी तरुण फुकट चांगले शिक्षण देतील. शिक्षणासाठी जास्त खर्च करायची आवश्यकता पडणार नाही. कोरोनाने शिकवील आनलाईन शिक्षण.स्वयंमसेवी संस्था आहेतकीराव शिकवायला फुकट.🙏जय हो मोदीजीकी.🙏
One nation one education .. one nation one syllabus... one nation One board ... take the education is nationalized free and compulsory to 12th of class at least...... this is revolutionary step for our country and our education
भाऊ, शिक्षण हे राज्य आणि केंद्र दोन्हि अनुसूची चा विषय आहे!
त्यामुले वन नेशन, वन पॉलिसी, जे काही तुम्ही बोलत आहात ते शक्य नाही!
मग ते मोदी असो वा कूनी, मुमकिन नाही!
Yes , same view ,this change will change entire education .
Why free ...condom also u want free
Paid schools destroying govt. Schools .....
संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होनार आहे तर टीप्पनी देखील मराठीतून द्यावी😂
मराठि भाषेत क्षिक्षण शिकायला आणि समजायला सोप जाईल खुप छांन निर्णय🙏
मराठी भाषेतून इंजिनीअरिंग आणि मेडिकल शिक्षण द्यायचे असेल तर खूप संशोधन करावे लागेल.
निर्णय चांगला आहे पण.
मराठी भाषेत तेवढे तज्ञ आहेत का मेहनत घ्यायला बदल हा स्वागतार्ह आहे पण तो तितकाच पावरफूल असावा नाहीतर शिक्षणाचे धिंडवडे
कोणतही ज्ञान मातृभाषेतून परिणाम कारक असते
Engineering and Medical education must be English not in mother tongue
मातृभाषेतुन घेतलेले ज्ञान खुप पुढे घेऊन जाते, ते बंधनकारक नसते.......
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जय ज्योती जय क्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय संविधान की जय हो जयहिंद
Bol Bhidu, Your team always makes detailed video on each topic. And your channel covers all topics of each field. Awesome content, all the best.
अंमल बजावणी नंतर दोष लक्षात येतात हे खूप मोठे दुर्दैव आहे...
त्यात अख्खी एक पिढी भरडली जाते
त्यामुळे पालकांनी अधिक जागृत राहून पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे
अंमल बजावणी करण्या पूर्वी लाभ धारकांचे, तज्ञ व्यक्तींचे अभिप्राय, सूचना यांची कदर केली जात नाही, शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो.
please share ur thought
Sir फक्त इंजिनीरिंग च मराठीतून असेल कि bsc agree यासारखे जे dgree course आहेत ते ही या शैक्षणिक धोरणात मराठीतून असतील का.. मला agree मध्ये entrest आहे पण माझे इंग्लिश जेमतेम आहे plz guide
शिक्षण हे प्रत्येक माणसाची गरज आहे. सरकारी शाळांचा दर्जा वाढवा असा वाढवा की खाजकी शाळांपेक्षा सरकारी शाळेत पालकांनी मुलांना admission घेण्यास भाग पाडलं पाहिजे. सरकारी शाळेतील शिक्षक जेवढा पगार घेतात तेवढी त्यांना जबाबदारी सोपवा. किती वेळाही plan बदला जोपर्यंत शिक्षणाचा दर्जा वाढणार नाही तोपर्यंत काही होणार नाही.
मातृभाषा मध्ये आपण शिकायचं आणि Corporate job sathi English मध्ये Interview देताना किती मुलांचे हाल होऊ शकतात. ह्याचा विचार कारायला हवा.
शिक्षक भरती / प्राध्यापक भरती मधला भ्रष्टचार पूर्णपणे कमी झाला पाहिजे.
Kami zala pahije mhnje thoda asla chalto as bolaycha ahe ka tumhala
@@ItachiUchiha-yk3ur तूम्ही असा अर्थ काढला म्हणजे तुम्हाला काहीतरी फायदा होतोय का? कमी म्हणजे पूर्णपणे कमी असा पण अर्थ घेऊ शकता.
@@mmk2044 mi tech boltoy purnpane nasta kra as namud pahije hot
Kmi bolun nhi chalnar ho dada....0 ch zala pahije
@@ItachiUchiha-yk3ur edit केले 🙏
Bhau tumcha mhna brbr ahe hya Itachi uchiha la samjla nhi yawar ek kavita athvli
Ek hota zurad mmk chi Gand Marin sarad
खर तर तुम्ही आम्ही प्रि प्रायमरी , प्रायमरी
याच्या स्कूल फी बद्दल चर्चा करयला पाहिजे.
एक एपिसोड बोल भिडू ने करायला पाहिजे
नमस्कार
वाह...खूपच छान निर्णय सरकारचा...
मुलांच्या आवडीला आणि निवडीला १००% न्याय दिला असे म्हणणे वावगे ठरणार नाही...
नक्कीच चांगला बदल आहे...
पालकांचा ताण मात्र गेला...
आम्हाला मान्य आहे...
मनापासुन धन्यवाद...🙏👌👌👌👌👌👌👌👍
खूप छान माहिती दिलीय. धोरण निश्चितच चांगलंय पण मराठी मध्ये technical subjects म्हणजे थोडा limitations येतील शेवटी global platform चा सुद्धा विचार केला पाहिजे बाकी मराठी ला टिकवण्यासाठी तो विषय अनिवार्य करावा हरकत नाही पण सुपूर्ण शिक्षण नको असे वाटते. Music सारख्या विषयाचा चॉईस पण चांगलंय कारण आपल्या देशाला कलेची मोठी परपरा आहे.
सर्व शिक्षण NCERT या एका छताखाली आणले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील बदल स्वागतार्ह आहे.
नविन धोरणात एखादा विद्यार्थी आपल्या आवडीचे विषय निवडू शकतो. अगदी विज्ञान विषयाच्या सोबत त्याला छंद म्हणून गायन वादन हा विषयही निवडता येईल. उच्च शिक्षणही मातृभाषेतून घेता येईल.
पण प्रश्न आहे तो एवढ्या सुसज्ज शाळा आणायच्या कोठून? एवढे skilled teachers आणायचे कोठून? शिक्षकांची नविन भरती करायची म्हटले तर विद्यमान पाट्या टाकू शिक्षकांचे काय करायचे हा प्रश्न उरतोच. नविन शैक्षणिक धोरण कितीही चांगले असले तरी शिक्षक संघटनांचे नेते, स्थानिक अंहंमान्य नेते, गावागावातील जातीजातींतील व गटातटांतील राजकारण, लहरी व भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले शिक्षण विभागातील अधिकारी इत्यादी घटक या धोरणाच्या मूळ गाभ्यालाच नख लावतील यात शंका नाही.
यांत इलाज एकच - शिक्षण विभाग हा निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्त आणि राजकारण विरहित असावा, शिक्षकांच्या पतसंस्था बरखास्त कराव्यात आणि शिक्षकांना संघटनेचा अधिकार नसावा. शिक्षकांच्या फिटनेससाठी कवायतींसारखे उपक्रम राबवावेत. आठवीपासून प्रत्येक विद्यार्थ्यास एन.सी.सी. अनिवार्य करावी.
100 %
बरोबरच आहे...
या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे,मोदी चे आतापर्यंत चे सगळे धोरण पुर्णपणे फेल आहेत,उज्वला योजने पासून नोट बंदी पर्यंत जनता याची झळ सोसत आहे,इथ आहे त्या शाळा सुसज्ज नाहीत म्हणे व्यायासायिक शिक्षण ,आणि मराठी माध्यमात शिक्षण यामुळे जागतिक लेव्हल ला भारतीय मुलांचे खाच्चिकरण आहे,एक ठराविक लोकांचा गट शिक्षणात पुढे जावा ,सामान्य लोकांचे मुले बेरोजगार व्हावे असे धोरण आहे
All schools and colleges need to develop accordingly.
सर्व प्रकारचे शिक्षण हे मराठी मधून घेता येईल ही गोष्ट खूप स्वागतार्ह आहे पण हल्ली सर्वांचा ओघ हा इंग्रजी माध्यमाकडे आहे विशेषतः पूर्व प्राथमिक आणि प्रथमिक शिक्षण खरंच हे नवीन शैक्षणिक धोरण कसे फायद्याचे ठरेल हे पाहणे महत्वाचे असेल.
सेमिस्टर पॅटर्न मध्ये अभ्यास वाढतो कमी होत नाही.. उलट आहे तेच पुस्तकं निम्मी होणार असतील तरच त्या वजन आणि परीक्षेचा उपयोग नाहीतर नवीन हत्ती जन्माला घालतील.. फी आणि पुस्तकांचा खर्चात
आदरणीय ##bol bhidu टीम आपण यामध्ये व्यवसायात शिक्षणा बद्दल माहिती सांगितली पण व्यावसायिक शिक्षकांची सध्याची परिस्थितीवर थोडा प्रकाश takava
Correct
Shikshak apatra aahet
सर्वच धोरणे चांगली असतात, implementation महत्त्वाचे.
मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे मुलाला आकलन आणि उपयोजन या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे समजतात खूप छान निर्णय आहे
“अभियांत्रिकी शिक्षण... आणि तेही मराठीत!” ऐकायला तरी अप्रतिम वाटतंय.
खरच खूप चांगली education policy आहे. सरकारचे अभिनंदन पण आता तात्काळ लागु करायला हवी आधीच खूप उशीर झाला आहे. मला ह्या शिक्षण पद्धतीने जाता आले असते तर किती चांगले वाटले असते असे वाटते. 🔥💯👏👍🫡💐🇮🇳
नोटबंदी gst पण अशिच भारी वाटत होती 2016 17 ला 🤣
खूप छान स्पष्टीकरण दिलात आपण 🙏
शिक्षण ही आता काळाची गरज राहिली नाही कारण पूर्वीच शिकले-सवरलेयाचा एका ठिकाणी आणून ढीग लावला तर हिमालयाएवढ्या उंच ढिग तयार होईल हो पण मुलीचा व मुलांचा वेगळा डिग लावा प्रत्येक शिकलेला नोकरीच नाही म्हणून काय त्या शिक्षणाचा नाद करून म्हातारा होऊन नंतर मुली पाहत फिरायचं कारण नोकरी बी नाही आणि वय बी गेलं आणि जवळचा पैसा गेला व बिनकामाचा शिक्षण शिकण्यात कमाईचवय गेलं
याला म्हणायचं संपूर्ण बरबादी
नमस्कार बोलभिडू, तुमचे सर्वच व्हिडिओ मी बघत असतो आणि almost सगळेच विषय तुम्ही नीट मांडता..
परंतु एका विषयावरील व्हिडिओची मी आतुरतेने वाट बघतोय.
नवीन शैक्षणिक धोरणात पाचवी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून घेण्यावर भर देणार आहेत आणि हा मुद्दा सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये मांडलात त्याबद्दल तुमचे आभार..
खरंतर संपूर्ण शालेय शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवं तरी सरकारने निदान पाचवी पर्यंतचा तरी पर्याय ठेवलाय हे त्यातल्या त्यात उत्तम.
पण आपल्या समाजात याची जागृती होणं खूप गरजेचं आहे की शालेय शिक्षण मातृभाषेतून का व्हावं, त्या मागचे नक्की काय फायदे आहेत?
सुरुवातीपासूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून शिक्षण घेतल्याने मुलांवर आणि पर्यायाने समाजावरसुद्धा काय परिणाम होतात यावर एक सखोल व्हिडिओ बनवावा.. कारण तुमच्या प्लॅटफॉर्मवर खूप audiance असल्याने समाजात आणखी जनजागृती येईल.
२०१० पर्यंत शालेय शिक्षण मातृभाषेतून झालेली आपली पिढी आज अस्खलित मातृभाषेसोबतच इंग्रजीची कास धरूनही प्रगती करत आहे..आणि त्या नंतरची संपूर्ण इंग्रजी शिक्षण घेत असलेली आताची तरुण पिढी, यामधला फरक आपल्यासमोर आहेच. या व्हिडिओसाठी तुम्ही सुप्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री सुमित राघवन-चिन्मयी सुमित, फेसबुक वरील मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत हा समूह, बालभारती चित्रपट आणि काही तज्ञांचीसुद्धा मदत घेऊ शकता.
माझी मुलगी आता ४ वर्षांची आहे आणि मी तिला या वर्षीपासून मराठी शाळेत शिशुवर्गात घातलेलं आहे म्हणून मी हक्काने या व्हिडिओसाठी आग्रही आहे. जेणेकरून तुमच्या व्हिडिओने माझ्या सारखे आणखी पालक तयार होतील..
खरंतर ! शिक्षण पध्दतीत बदल म्हणजे स्वागतार्थ आहे.पण त्याच बरोबर निमशासकीय खाजगी शाळेची " दुकान" बंद करा किंवा कमी करा लय वाट लावत आहे हो हे ग्रामीण भागात !!!!
When will be this implemented at school level?
Will these hv different boards viz cbse, icse etc?
वेळेनुसार शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे अतिशय योग्य असा निर्णय आहे .शिक्षण है आपला देश प्रगत होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे .आणि त्यामध्ये जर शिक्षणाचा पाया जर चांगला असेल तर पुढील विकास सुद्धा नक्कीच दिसेल
धन्यवाद सर, अतिशय महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.खूप उशीर झाला हे धोरण अंमलात आणण्यासाठी, स्पोर्ट्स चार मुद्दा खूप छान आहे.आज आपल्या देशाला या शैक्षणिक धोरणाची गरज आहे.लवकर अंमल असो.
It is a good move to include children from the rural areas and those who are comfortable in their mother tongue.
What about children who have to move from one state to another because of their parents' transfers???
How many languages will they have to learn? How will they adjust every time they move ?
I hope there some provision for them too.....
Not all children are good with learning a new language!!!
Spoken is easier than written in most cases.
I can speak about this as I have suffered this and have handled children who have gone through this too as I was a teacher of primary classes for 20 years.
नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उपलब्ध आहे का? यासाठी काय नियोजन आहे कृपया या संबंधीचा विडिओ बनवा... नवीन धोरणाकडून अपेक्षा ठेवायच्या की नाही हे ठरवता येईल.... कारण किती तरी चांगले धोरण नीट न राबवल्यामुळे अपयशी झाल्याचे भरपूर उदाहरण आहेत आपल्या समोर.
ज्वलंत विषय आहे,यावर पण माहिती हवी
अंमलबजावणी कशी केली जाणार हे सुद्धा महत्वाचे आहे. शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे.
फारच छान आणि सोप्या शब्दात माहिती दिली. बोल भिडू टीमचे माहिती संकलन आणि सादरीकरण खूपच छान
खूप सुंदर माहिती दिलात सर ..
शिक्षण धोरणा सोबतच शिक्षकां च्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. शासन जो बदल करतय त्यामध्ये अध्यापन पद्धतीचा सुद्धा विचार करणं महत्वाचं राहिल.नवनवीन शैक्षणिक साधने व कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना समजण्या योग्य शिक्षण देण्यात यावं...
बाकी बदल तर होतच राहतील. यात कांहीं शंका नाही. बाकी मराठी भाषेत शिक्षण देणे आणि त्याचा स्वीकार हा एक अमुलाग्र बदल म्हणायला लागेल..
आता आम्ही म्हणायला मोकळे,
मी मराठी.... मी मराठी.....मी बोलतो मराठी..
जय शिवराय....जय महाराष्ट्र....
शिक्षकांना पगार शिवाय बाकी लोकांसारखे 2 नंबर चे धंदे ,कमिशन मिळत नाही भाऊ...तुम्ही एकटेच शिकले असाल म्हणून शिक्षकांचा पगार डोळ्यात खुपत असेल
Sevabhavi pesha ahe.... profession nivadtana vichar kara...jevadha pagar ghetat tase shikvale tar samadhanach ahe....pidhi ghadate ...Ani desh pan
यांच्या मधले आर्धे आमदार 10 वी नापास असतील 😂
मुलामुलींना शिक्षणात पुढे जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करुन देताना, त्या संधीचा फायदा घेण्यासाठी खुप वेळ द्या ......
आजकाल संधी खुप आहेत, पण त्याच्या उपभोग घेण्यासाठी वेळ पुरेसा मिळत नाही.........
लहान मुलं जन्माला आल्या आल्या धावत नाही, पण त्याला थोडा वेळ दिला तर ते व्यवस्थित चालतं आणि धावतं सुद्धा........
एखादं मुलं लवकर चालतं, बोलतं तर एखादं मुलं उशीरा चालतं, बोलतं........
पण म्हणुन आई- वडील भिती निर्माण नाही करत, जर तु लवकर चाल्ला /चाल्ली किंवा बोल्ला/बोल्ली नाहीस तर तु माझा मुलगा/ मुलगी नाहीस, उलट ते मुलं चालण्यासाठी बोलण्यासाठी ते प्रयत्न करतात.......
अगदी तसचं शिक्षणाच्या बाबतीत आहे, जर मुलामुलींना त्यांचा वेळ दिला तर ते खुप छान अभ्यास करतील.......
पण आजकाल शिक्षणात शिक्षक धावतातचं पण मुलांना सुद्धा धावायला भाग पाडतात......
मुलांना पद्धतशीरपणे अभ्यास करण्याची गरज आहे, आणि त्यासाठी वेळ कमी आहे, म्हणुन मुलं रट्टा मारतात, वरच्यावर अभ्यास करतात, आणि पेपर झाल्यावर विसरुनही जातात, पण जे काही मुलं खोलवर जाऊन अभ्यास करतात, त्यांच्यासाठी वेळ अपुरा पडतो, त्यात ATKT चा धाक असतो, म्हणुन त्यांनासुद्धा रट्टा मारणं, वरचेवर अभ्यास करणं याशिवाय पर्याय उरत नाही.........
आणि यामधे पुढे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणारे विद्यार्थी सुद्धा confuse होतात, depression मधे जातात,
यासाठी, उपाययोजना करणं आवश्यक आहे......
ATKT चे chances वाढवण्यात यायला हवेत......
शेवटच्या वर्षापर्यंत chances मिळाले, तर मुलांना वेळ भेटेल, आणि ते व्यवस्थितपणे अभ्यास करतील, depression मधे जाण्यापासुन वाचतील.........
शिक्षणासाठी आणलेलं धोरण फार उत्तम आहे....तेवढंच उत्तम धोरण शिक्षकांसाठी आणलं तरच त्याचा सर्वांगीण उपयोग होईल.....आज शिक्षणाचा दर्जा जेवढा खालावलाय त्याहुन कित्येक पट शिक्षक (पेशा) चा दर्जा घसरलाय.....गुणवंत शिक्षकांची समाजाला फार नितांत गरज आहे....
शहरातली आणि श्रीमंताची मूल इंग्रजीच घेणार आणि गावाकडची गरीब आणि हुशार मुल मराठी घेऊन मागेच राहणार . शिक्षणात आंतराष्टीय भाषाच असावी फक्त .
मातृभाषेतून शिक्षण ही खूप चांगली बाब आहे पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी ची जोड हवी हेही तितकंच खरं आहे. 10 वी आणि 12 वी board पाहिजेच. मेन म्हणजे 12 वी पर्यंत शिक्षण हे free असायला हवं. समाजातील सर्व घटकांना म्हणजे ओपन, obc, sc, st या सर्वाना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी शासनाने शिक्षणावर 6.5% खर्च करायला हवा.....
मराठीत जर शिक्षण मिळाले तरच खर्या अर्थाने समाजात जो शिक्षणाविषयी न्यूनगंड आहे तो नक्कीच दूर होईल...मराठीमधून शिक्षण हे अगदी PHD पर्यंत पण असले पाहिजे....आणि अश्याने एकूणच समाजाची प्रगती होईल....
इंग्रजी बोलणारे देश जर सोडले तर बाकी सगळ्या देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळते. अगदी research सुद्धा मातृभाषेतूनच होतात ...
अतिशय सुंदर आणी सोप्या भाषेत् समजावून सांगितलेत सर, खूप खूप धन्यवाद
Excellent and so imp...video...nice explanation 👍 👏
खुपचं छान नियोजन आहे सरकारचं 👏👏 बेस्ट ऑफ लक 👍
Infrastructure aahe ka evdha karayla
Education wrcha kharcha check kela tar kalel
Pratyek school mullanna optional subject deu shakel ka
Aani parents war tyacha kevdha boja padnar aahe
Samjun ghya
सातत्यपूर्ण मूल्यमापन येऊन काय बदल झाला, कांहीच नाही. फक्त नाव बदलतात, काम तेच राहतात,
* गुरूजीला अभ्यासक्रम दया, पुस्तक दया आणि तेच शिकवू दया🙏🏻
पहिल्यांदा आरक्षण गुणवत्तेवर कारण गरजेचं आहे.नाहीतर ओपन वाले 99% मिळवून सुधा admission साठी पैसे ओतत असतात आणि 50%वाले फी माफ होते..
प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे होत सर्व कॅटेगीरीज साठी, आणि सर्व कॉलेजस चे मालक हे open कॅटेगरी वलेच आहेत तरी सुद्धा आपल्याच लोकांन कडून पैसे लुटत आहेत त्यावर लक्ष जाऊ नये म्हणून SC, ST, OBC कडे बोट दाखवत आहेत. तुलापन माहीत आहे कॉलेजस फक्त पैसे कमावण्यासाठी काढत आहेत हे लोक.
अशीच पद्धत जर्मनी मध्ये पण आहे आपल्या आवडीनुसार शिक्षण ❤
महाराष्ट्रामध्ये असे भरपूर लोक आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी नाही मग त्यांना मातृभाषेतून शिक्षण म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून की मराठीतून त्याचा खुलासा करावा
त्यांना सुद्धा मराठी मधून ग्यावे लागेल
@@sks1464 हे खरं असेल तर फार उत्तम होईल ,मराठी भाषा टिकून राहील महाराष्ट्र मध्ये, धन्यवाद
स्थित्यंतर फार कठीण आहे.
१) ज्या शाळेत १० वी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे ते १२ वी पर्यंत शिक्षण कसे देऊ करतील.
२) ज्या पदवीमहाविद्यालयांना कनिष्ठ महाविद्यालये संलग्न आहेत तिथे काय ?
३) जर कला शाखांचे विषय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवले जाणार असतील तर मग अभियांत्रिकीतील विषय कला शाखेच्या विद्यार्थ्यांना आहे त्याच Fees मध्ये शिकवणार का?
३) वैद्यकीय शाखेच्या मुलांना पण नृत्य/संगीत सध्याच्या अभ्यासक्रमातील एखादा विषय कमी करून शिकवला जाणार का?
४) वास्तुविद्या/स्थापत्यशास्त्र कला/वाणिज्य विद्यार्थ्यांना कशी आणि किती Fees मध्ये शिकवली जाणार?
५) असे विषयांची विचित्र सरमिसळ असलेल्या विद्यार्थ्यांला कुठल्या विषयातील work permit मिळेल?
पुष्कळ अनुत्तरीत प्रश्न आहेत.
US Start up bubble च्या नादी लागून सध्याची घडी पूर्णपणे विस्कटून टाकणे सयुक्तिक नाही.
सध्या जागतिक पटलावर Google, Microsoft सारख्या विविध MNC मध्ये सर्वोच्च पदावर पोहोचण्यास विद्यमान शैक्षणिक धोरणानेच हातभार लावला आहे. जर सरकारला खरोखरच शिक्षणाबद्दल आस्था असेल तर वर्षानुवर्ष रिक्त असलेली शैक्षणिक पदे त्वरित भरावीत असे माझे मत आहे.
या शिक्षण पद्धतीचा वापर हा फक्त स्टेट बोर्ड वाल्यांना होणार आहे की CBSC व ICSE बोर्ड वाल्यांना देखील होणार आहे??
Engineering marathi madhe shikavane haa vichar changla aahe..but aplya Kade most jobs MNC based/ USA based companies madhe astat. Tikde interview Ani sagle Kam English madhun aste. Asha veli problem yeu shakto.
खुप विस्तृत व सविस्तर माहिती आहे.....उत्तम सादरीकरण..
नवीन बदल मान्य करायला काही हरकत नाही परंतु आपल्या देशात असा म्हणजे जास्त प्रमाणात लोकसंख्या ही गरिबी खाली येते तर त्यांना पण या नवीन धोरणाचा फायदा होईल त्यांना परवडेल अशी अपेक्षा करतो ..बाकी फक्त 10th 12th ला महत्व दिलं जायचं तर या धोरणामुळे सर्वच शिक्षणाला महत्व दिल जाईल❤
thank you for information
Thousands of brilliant students in Maharashtra especially in rural Maharashtra are ignorant about the structure of MPSC and UPSC exams. Priliminary exam, Main exam and interview. My suggestion is you can make a video By interviewing an experienced government official from administrative service. You can make 2 to 3 hours video which would be informative and inspirational. It will be a great help for all those aspirants who want to appear for the examinations. Thank you!
how do u know there are thousands and they r brilliant ?
The entire population of Maharashtra is 125 million.out of 125 million people,I think, it is not difficult to imagine that there might be at least thousands of students who are brilliant.
स्पष्ट माहिती संकलित करून मिळाली..खूप छान
From which year it will be applicable and what effects on old policy
अभिनंदन सर
How this new education policy is getting sync with the international study abroad which is currently based on 12th results for undergraduate and graduation results for PG..
Though it's for small portion of students, is an important factor to look into.
Khup chan. Thank You.
शिक्षणाचा पार खेळ झालाय,
सर्व शिक्षण केंद्राच्या अखत्यारीत असावे, सर्वच शाळेतून CBSC पॅटर्न राबविण्यात याव्यात, संस्था बंद करून सरकारने शिक्षण ताब्यात घ्यावे, पूर्ण शिक्षण मोफत दयावे,
Always your channel gives very informative information. Really thnks Bolbhidu channel & it's excellent team.
शिक्षणाचे खाजगीकरण वाढेल. शिक्षण महाग होईल.
Aata tari kuthe swasta aahe?
Already बाजार केलाय नेत्यांनी आणि शिक्षकांनी
NEP 2020 पूर्ण वाचली का रे तू?
@@sumitgpatil काही प्रमाणात वाचली आहे सर.
NEP च्या कार्यशाळेला हजेरी लावली आहे.
@@sumitgpatil सर आपण ज्ञात असालच, NEP विषयी.
आभारी आहोत.
२०२३-२०२४ साठी शाळेकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आली नाही. क्लासेस वाल्यांनी दहावी बोर्ड असणार असे सांगितले आहे. खरं काय आणि कधी पासून हे धोरण लागू होणार हे शासन आणि शाळेकडून सांगण्यात यावे.
पहिली ते पाचवी पर्यंत मातृभाषा, हा एक नंबर निर्णय
Chattrapati shivaji maharaj book is included in this new education policy
लवकरात लवकर लागू व्हायला हवं😍
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान explain केलं सर खूप छान👍👍👍
कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व कोर्स, अभ्यासक्रम सेम असायला पाहिजे...
#One Nation Same Education
Agreed 👍
12vi paryant shikshan free kara mulbhut adhikara Khali sarvanaa
Sir in new education planing two type education system can i take? Please give me proper gidence.
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली पण फक्त शाळा कॉलेजचा विचार केला तर शहरातच मेट्रो शहरातच फक्त शाळा कॉलेजची सुधारला होते अजूनही तालुका वाईस ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये अजूनही मुलांना बसायला वर्ग नाही खुल्या नाही व्यवस्थित पत्रे नाही शाळा नाही गुणवत्ता आहे पण या कारणामुळे ग्रामीण भागातले मुले मागे राहतात अजूनही शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पावसामध्ये ग्राउंड वर चिखल होतात व्यवस्थित कंपाउंड नाही लोकवर्गणीतून हे सर्व काम करावे लागतात तरी शासनाने ग्रामीण भागात पूर्ण ताकदीने लक्ष द्यायला ही शासनाला विनंती
Language will not be the issue if one has to understand engineering they can understand through any medium.
Do let us know your views too.
#Bolbhidu
शिक्षण इंग्रजीतूनच हवे
@@Renaissance861 तुम्हाला मराठीत शिकायची लाज वाटत असेल तर खुशाल शिका, पण ज्यांना इंग्रजी केवळ भाषा म्हणून शिकायची आहे अणि इतिहास, नागरिकशास्त्र यांसारखे इतर विषय मराठीत शिकायचे आहेत, त्यांना नव्या व्यवस्थेत पर्याय मिळेल। तसंही नविन शैक्षणिक धोरण मातृभाषा प्रमोट करत आहे. तुमची मातृभाषा बदलून खुशाल इंग्रजी करा, अणि इंग्रजीत शिका
What about 12 moving students who are recent to go in 12th ?
Is this policy applicable to them also from this year?
From when this policy going to be applied ?
no...
applicable for only 10th to 11th moving students
चांगली माहिती मिळाली. यापुढील अपडेट्स वर व्हिडीओ बनवून अपलोड करावेत ही विनंती.
Skill oriented ......policy....nice explanation sirji 👍👍👍👍
ह्या वर्षी नवीन पुस्तके असणार का ??
Nice Education policy . This will really change the youths and lead to development of country 🙌🧡
Exactly🖤
So Nice and useful New education policy 👍 it. Will be really helpful to the students to take as their education what they are interested in
सगळं शिक्षण सरकारी शाळेत असावं.निवडणुक लढणार्या व्यक्तींची मुलं सरकारी शाळेत शिकण्याची अट असावी.मराठी मुद्द्यावर मत मागायची आणि स्वतः ची मुलं परदेशात किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायची.सरकारी गोष्टींचा वापर करण्याची मानसिकता लोकांची व्हायला हवी........
Sir b.ed 1 year ch hoil ka ? Ya varshi pasun.. New edu. Policy nusar
Private schools che manmani kami krnyasathi kayda banwa..! 3rd std cha mula n cha pustakan sathi 6500 Rs.
School almanac again 1200 Rs.
class photograph again 400 Rs.. compulsory to be paid.
For Extra curricular activities again pay extra cost..!
No NCERT books allow to use.. compulsory to use private publications assigned by school.
Fed up..!
Excellent change in educational system.govt should see that it is implemented in all schools.I hope even CBSE schools are included.
The burden of expenses should not fall on parents via Donations or increase in fees
Nice education policy. It should be implemented properly in all schools.
khup chan dada batami vachali hoti pn tumi purna spashta karun sangitalat dhanyavad 🙏🏻
Good decision...Hya saglyacha record online hava..result pasun documents sagle..under one heading and one website nationwide.
Authentication cha issue nahi and fraud pn krta yenar nahi
I completly agree with you sir
ते already झालं आहे सर. मी माझे सगळे documents digiLocker या सरकारी app मध्ये store करून ठेवतो। आधार कार्ड, pan कार्ड, १०वी- १२वी च्या सनद, मार्कशीट, ड्राइविंग लायसन्स , अगदी सगळं कही :) तुम्ही सुद्धा वापरून पहा (स्टेट बोर्ड ने २०१० पूर्वीच्या batch चा डेटा अजुन अपलोड केला नसावा, त्यामुळे फ़क्त १०वी च्या मार्कशीट साठी प्रॉब्लेम येऊ शकतो )
Paper exam never judge your skills life exam will improve our knowledge
चांगली माहिती दिलीत. धन्यवाद. 🙏
खूप छान माहिती दिलीत सर मनापासून आभार